मुंबई (प्रतिनिधी): बारामती, पुणे आणि मुंबईसह राज्यभरातील अन्य ठिकाणी प्राप्तीकर विभागाने (इन्कमटॅक्स विभाग) टाकलेल्या छाप्यांमध्ये १८४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. ७० ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ही बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यातील एका बड्या राजकीय घराण्याशी संबंधित हे छापे असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाने दिली असून टॅक्स विभागाचा अप्रत्यक्ष रोख उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे असल्याचे स्पष्ट आहे. ७ ऑक्टोबर रोजी प्राप्तीकर विभागाने ७० ठिकाणी छापे टाकले होते. यात अजित पवारांच्या निकटवर्तीयांचाही समावेश होता. प्राप्तीकर विभागाच्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, बारामती, गोवा, जयपूर या शहरात ७० ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते. या छाप्यात बेकायदेशीर रित्या रक्कम फिरवण्यात आल्याचे प्राप्तीकरला आढळून आले आहे.
राज्यातील एका बड्या राजघराण्याचा संबंध असल्याचा प्राप्तीकरच्या प्रसिद्धीपत्रकात उल्लेखकरण्यात आला आहे. ही रक्कम मुंबईत मोक्याच्या जागी कार्यालयाची इमारत खरेदी करण्यासाठी, दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत फ्लॅट खरेदी करण्यासाठी, गोव्यात रिसॉर्ट खरेदी, राज्यात विविध ठिकाणी शेत जमीन खरेदी करण्यासाठी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवण्यात आल्याची माहितीही प्राप्तीकर खात्याने दिली आहे.
यासाठी १७० कोटी रुपये वापरण्यात आल्याचीही माहिती प्राप्तीकर खात्यातर्फे देण्यात आली आहे. या छाप्यांमध्ये २ कोटी १३ लाख रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि ४ कोटी ३२ लाख रुपयांचे बेहिशेबी दागिनेही जप्त करण्यात आल्याचेही प्राप्तीकर खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…