बारामती, पुणे आणि मुंबईतील छाप्यांत सापडली १८४ कोटींची बेहिशेबी मालमत्ता

  94


मुंबई (प्रतिनिधी): बारामती, पुणे आणि मुंबईसह राज्यभरातील अन्य ठिकाणी प्राप्तीकर विभागाने (इन्कमटॅक्स विभाग) टाकलेल्या छाप्यांमध्ये १८४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. ७० ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ही बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्याचे सांगण्यात आले आहे.


राज्यातील एका बड्या राजकीय घराण्याशी संबंधित हे छापे असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाने दिली असून टॅक्स विभागाचा अप्रत्यक्ष रोख उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे असल्याचे स्पष्ट आहे. ७ ऑक्टोबर रोजी प्राप्तीकर विभागाने ७० ठिकाणी छापे टाकले होते. यात अजित पवारांच्या निकटवर्तीयांचाही समावेश होता. प्राप्तीकर विभागाच्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, बारामती, गोवा, जयपूर या शहरात ७० ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते. या छाप्यात बेकायदेशीर रित्या रक्कम फिरवण्यात आल्याचे प्राप्तीकरला आढळून आले आहे.


राज्यातील एका बड्या राजघराण्याचा संबंध असल्याचा प्राप्तीकरच्या प्रसिद्धीपत्रकात उल्लेखकरण्यात आला आहे. ही रक्कम मुंबईत मोक्याच्या जागी कार्यालयाची इमारत खरेदी करण्यासाठी, दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत फ्लॅट खरेदी करण्यासाठी, गोव्यात रिसॉर्ट खरेदी, राज्यात विविध ठिकाणी शेत जमीन खरेदी करण्यासाठी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवण्यात आल्याची माहितीही प्राप्तीकर खात्याने दिली आहे.


यासाठी १७० कोटी रुपये वापरण्यात आल्याचीही माहिती प्राप्तीकर खात्यातर्फे देण्यात आली आहे. या छाप्यांमध्ये २ कोटी १३ लाख रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि ४ कोटी ३२ लाख रुपयांचे बेहिशेबी दागिनेही जप्त करण्यात आल्याचेही प्राप्तीकर खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती