बारामती, पुणे आणि मुंबईतील छाप्यांत सापडली १८४ कोटींची बेहिशेबी मालमत्ता


मुंबई (प्रतिनिधी): बारामती, पुणे आणि मुंबईसह राज्यभरातील अन्य ठिकाणी प्राप्तीकर विभागाने (इन्कमटॅक्स विभाग) टाकलेल्या छाप्यांमध्ये १८४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. ७० ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ही बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्याचे सांगण्यात आले आहे.


राज्यातील एका बड्या राजकीय घराण्याशी संबंधित हे छापे असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाने दिली असून टॅक्स विभागाचा अप्रत्यक्ष रोख उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे असल्याचे स्पष्ट आहे. ७ ऑक्टोबर रोजी प्राप्तीकर विभागाने ७० ठिकाणी छापे टाकले होते. यात अजित पवारांच्या निकटवर्तीयांचाही समावेश होता. प्राप्तीकर विभागाच्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, बारामती, गोवा, जयपूर या शहरात ७० ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते. या छाप्यात बेकायदेशीर रित्या रक्कम फिरवण्यात आल्याचे प्राप्तीकरला आढळून आले आहे.


राज्यातील एका बड्या राजघराण्याचा संबंध असल्याचा प्राप्तीकरच्या प्रसिद्धीपत्रकात उल्लेखकरण्यात आला आहे. ही रक्कम मुंबईत मोक्याच्या जागी कार्यालयाची इमारत खरेदी करण्यासाठी, दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत फ्लॅट खरेदी करण्यासाठी, गोव्यात रिसॉर्ट खरेदी, राज्यात विविध ठिकाणी शेत जमीन खरेदी करण्यासाठी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवण्यात आल्याची माहितीही प्राप्तीकर खात्याने दिली आहे.


यासाठी १७० कोटी रुपये वापरण्यात आल्याचीही माहिती प्राप्तीकर खात्यातर्फे देण्यात आली आहे. या छाप्यांमध्ये २ कोटी १३ लाख रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि ४ कोटी ३२ लाख रुपयांचे बेहिशेबी दागिनेही जप्त करण्यात आल्याचेही प्राप्तीकर खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकांवर आधारित

मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस फक्त वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकेवर

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण