'मुख्यमंत्री बायकोच्या नावाने घोटाळे करतील तर जनता जाब विचारेलच'

मुंबई : दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी 'कोणाच्याही बायका मुलांवर आरोप करणे हा अक्करमाशीपणा आहे', असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. यावर आता सोमय्यांनी प्रतिक्रीया दिली आहे.


किरीट सोमय्या म्हणाले, 'मी ठाकरेंनी केलेल्या विधानाशी सहमत आहे. खोटे आरोप केलेले योग्य नाही. परंतु उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावाने घोटाळा करत असतील तर जनता सवाल करणारच. मुख्यमंत्री लुटमार करतात. उपमुख्यमंत्री तर अरे बापरे!.


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधान केले होते की, माझ्या बहिणीच्या घरी इनकम टॅक्सवाले का गेले? किरीट सोमय्यांनी सगळी कागदपत्रे ठेवली ना? तर बायकोच्या नावाने, बहिणीच्या नावाने घोटाळा करणे हे त्याहीपेक्षाही मोठे पाप आहे. मग ते मुख्यमंत्री असो, वा उपमुख्यमंत्री असो! असे सोमय्या म्हणाले.


मुख्यमंत्र्यांचा मुलगा त्या बिल्डरसोबत संचालक होता, किरीट सोमय्याने कागदपत्रे ठेवली ना? मग पार्टनरशीप का मागे घेतली? त्यामुळे पार्टनरशीपचा मिळालेला पैसा बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणार असाल तर त्याचा जाब मुख्यमंत्र्यांना देणे भाग आहे असे ते म्हणाले.



पवार कुटुंबावरही टीका


'अजित पवार, सुनेत्रा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार आणि आता ठाकरे सरकारमध्ये एक नवीन माफिया साथीदार सापडला आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे. आता हे पहिला हल्ला सुरू करून सीबीआय, ईडी, इनकम टॅक्सना टार्गेट करणार, आमच्या बायका-मुलांवर कारवाई होत आहे, हे सर्व मोदी घडवून आणत आहेत असे बोलणार. समाजातले कार्यकर्ते जे ह्यांचेच पीआर यंत्रणा आहेत तेही आपले काम सुरू करणार. परंतु राज्याच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणेमध्येही काही चांगले अधिकारी आहेत. आणि न्यायालयही जनतेच्या बाजूने उभे राहणार.' असे सोमय्या म्हणाले.


Comments
Add Comment

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला

भायखळ्यात इमारत खोदकामादरम्यान माती कोसळली

दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू मुंबई  : भायखळा पश्चिमेकडील हंस रोड परिसरात हबीब मेंशन इमारतीच्या पुनर्विकासाचे

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी