काश्मीरमधील शिक्षकांच्या हत्येचा कल्याणमध्ये भाजपकडून निषेध

  110

कल्याण (वार्ताहर) : जम्मू-काश्मिरमध्ये असलेली शांतता दहशतवाद्यांना सहन होत नसून त्यांच्याकडून सर्वसामान्य लोकांवर होणारे हल्ले यातच दशतवाद्यांची निराशा दिसून येत आहे. त्यामुळे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या नापाक योजना कधीही यशस्वी होणार नाहीत असे प्रतिपादन भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केले.


काश्मीरमधील दोन शिक्षकांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमधील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळ निषेध व्यक्त करण्यात आला. भाजप शहर सचिव राजेश सिंग यांनी आयोजित केलेल्या या निषेध मोर्चात भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेलार, उत्तर भारतीय मोर्चाचे शहर सचिव अश्विन शुक्ला, उपाध्यक्ष सच्चीदानंद दुबे, अजय गुप्ता, वॉर्ड क्र ४ अध्यक्ष नीरज मिश्रा, ललित सारंग, भास्कर तीठे, राजकुमार सारस्वत, किशोर चौधरी, आलोक उपाध्याय, प्रा. आर आर त्रिपाठी, दीनानाथ तिवारी, श्रीकांत उपाध्याय, सी एस पांडे, राम अवध यादव, पी पी सिंग, श्रीनाथ सिंग, प्रमोद सिंग यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.