‘झोळीची भाषा वसुलीबाजांनी करू नये’

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतच वसुलीचे १०० कोटी तिजोरीत येत होते. फकिरी आणि झोळीची भाषा आयत्या बिळावरचे नागोबा आणि वसुलीबाज नाही करू शकत, असा पलटवार भाजपने शुक्रवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.


शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्याला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘पक पक पकाक’ अशा शीर्षकाने त्यांनी टि्वट केले आहेत. त्यांना हीरक महोत्सव आणि अमृत महोत्सव यातला फरक कळत नाही, हे कसले विचारांचे सोने लुटणार? यांना केवळ वसुली आणि वाझे माहीत आहेत. गुजरात होते म्हणून ड्रग्ज पकडले गेले. तुमच्या मंत्र्यांनी हर्बल तंबाखू म्हणून ते विकून तिजोरी भरली असती. थोडे तुम्हालाही पाठवले असते, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.


सोनिया गांधी यांचे जोडे उचलणाऱ्यांनी राजनाथ सिंह यांची लायकी काढावी. हा किती मोठा विनोद. पण ते जिंकून आले आहेत, तुमच्यासारखे पंतप्रधानांना फोन करून मागल्या दराने मुख्यमंत्री थोडेच झाले आहेत, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली. राहुल गांधींची चाकरी स्वीकारल्यापासून हिंदुत्वाशी फारकत घेतली, आता समाजवादी पार्टीची बिर्याणी घरी येऊ लागलेली दिसते, कारण भारत माता की जय, ऐकून पोटात मुरडा येतोय, अशी टीकाही त्यांनी केली.

Comments
Add Comment

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सूत्रे आता सुनेत्रा पवारांच्या हाती

पवार कुटुंबीयांच्या बैठकीत ठरले; सुनेत्रा पवार घेतील तो निर्णय नेते आणि पदाधिकारी मान्य करणार मुंबई :

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक : ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडले. जिल्हा

उबाठाला मनसेची भीती, महापौर,उपमहापौर निवडणुकीतून काढली पळ

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी उबाठाच्यावतीने उमेदवार देण्यात येणार अशाप्रकारची वल्गना करत

Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्ता वा लोकप्रियतेसाठी काम करीत नाही! - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

संघ कोणाच्या विरोधात नाही, संघकार्य हे राष्ट्रासाठी मुंबई : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही व्यक्ती, पक्ष

Devendra Fadnavis: आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️येत्या २-३ महिन्यांत भविष्योन्मुख धोरणे आणणार, अॅडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६ नागपूर: येत्या काळात

राज्यसभेआधी बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक?

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे जागा रिक्त मुंबई : स्थानिक स्वराज्य