‘झोळीची भाषा वसुलीबाजांनी करू नये’

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतच वसुलीचे १०० कोटी तिजोरीत येत होते. फकिरी आणि झोळीची भाषा आयत्या बिळावरचे नागोबा आणि वसुलीबाज नाही करू शकत, असा पलटवार भाजपने शुक्रवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.


शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्याला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘पक पक पकाक’ अशा शीर्षकाने त्यांनी टि्वट केले आहेत. त्यांना हीरक महोत्सव आणि अमृत महोत्सव यातला फरक कळत नाही, हे कसले विचारांचे सोने लुटणार? यांना केवळ वसुली आणि वाझे माहीत आहेत. गुजरात होते म्हणून ड्रग्ज पकडले गेले. तुमच्या मंत्र्यांनी हर्बल तंबाखू म्हणून ते विकून तिजोरी भरली असती. थोडे तुम्हालाही पाठवले असते, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.


सोनिया गांधी यांचे जोडे उचलणाऱ्यांनी राजनाथ सिंह यांची लायकी काढावी. हा किती मोठा विनोद. पण ते जिंकून आले आहेत, तुमच्यासारखे पंतप्रधानांना फोन करून मागल्या दराने मुख्यमंत्री थोडेच झाले आहेत, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली. राहुल गांधींची चाकरी स्वीकारल्यापासून हिंदुत्वाशी फारकत घेतली, आता समाजवादी पार्टीची बिर्याणी घरी येऊ लागलेली दिसते, कारण भारत माता की जय, ऐकून पोटात मुरडा येतोय, अशी टीकाही त्यांनी केली.

Comments
Add Comment

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ, पोलिसांनी केला हस्तक्षेप

छत्रपती संभजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजिलेल्या

आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले होते. जरांगेंचे आंदोलन

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी