जेईई अ‍ॅडवान्स परीक्षेत मृदूल अग्रवाल देशात पहिला

नवी दिल्ली : जेईई अ‍ॅडवान्स २०२१ परीक्षेत जयपूरच्या मृदूल अग्रवालने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये दिल्ली झोन मधून काव्या चोप्रा या विद्यार्थिनीचा पहिला क्रमांक आला आहे. मृदूलने आयआयटी-जेईई प्रवेश परीक्षेत ३६० पैकी ३४८ गुण मिळवून आतापर्यंत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे. त्याची टक्केवारी ९६.६६ इतकी आहे. २०११ नंतर हे कुठल्याही विद्यार्थ्याने मिळवलेले सर्वाधिक गुण आहेत.


निकालात देशभरातून ४१ हजार ८६२ विद्यार्थी क्वालिफाय झाले आहेत. मुंबईचा कार्तिक नायर हा विद्यार्थी देशातून सातवा आणि राज्यातून पहिला आला आहे तर निरिजा पाटील ही मुंबई झोन मुलींमध्ये पहिली आली आहे.


दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजेंसी (एनटीए) कडून जेईई मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षेच्या पेपर दोनचा निकाल जाहीर करण्यात आला. आता जेईई अ‍ॅडवान्सचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आपला निकाल jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात. हा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना आपला अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख टाकावी लागणार आहे. एनटीएकडून बीटेकचे निकाल आधीच जाहीर करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Rain Alert: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

नवी दिल्ली: दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांमुळे हवामान बदलले. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर

गडबड कराल तर पस्तावाल असा धडा शिकवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा झेंडा

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या कौशल्यधारित संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत

Gmail ID : २२ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा 'रटाळ' Gmail ID; सुंदर पिचाईंनी दिली आनंदाची बातमी

कॅलिफोर्निया : जर तुम्ही १५-२० वर्षांपूर्वी एखादा ईमेल आयडी बनवला असेल आणि आज तो वापरताना तुम्हाला संकोच वाटत

दिल्लीत डोंगराची हवा विकणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: दिल्लीच्या विषारी हवेत श्वास घेणे कठीण होत असेल तर काय करावे? फक्त ५० रुपये द्या आणि हिमाचलच्या

Customs Duty on Petrochemical Products: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द; अनेक क्षेत्रांना होणार फायदा

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या