जेईई अ‍ॅडवान्स परीक्षेत मृदूल अग्रवाल देशात पहिला

नवी दिल्ली : जेईई अ‍ॅडवान्स २०२१ परीक्षेत जयपूरच्या मृदूल अग्रवालने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये दिल्ली झोन मधून काव्या चोप्रा या विद्यार्थिनीचा पहिला क्रमांक आला आहे. मृदूलने आयआयटी-जेईई प्रवेश परीक्षेत ३६० पैकी ३४८ गुण मिळवून आतापर्यंत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे. त्याची टक्केवारी ९६.६६ इतकी आहे. २०११ नंतर हे कुठल्याही विद्यार्थ्याने मिळवलेले सर्वाधिक गुण आहेत.


निकालात देशभरातून ४१ हजार ८६२ विद्यार्थी क्वालिफाय झाले आहेत. मुंबईचा कार्तिक नायर हा विद्यार्थी देशातून सातवा आणि राज्यातून पहिला आला आहे तर निरिजा पाटील ही मुंबई झोन मुलींमध्ये पहिली आली आहे.


दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजेंसी (एनटीए) कडून जेईई मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षेच्या पेपर दोनचा निकाल जाहीर करण्यात आला. आता जेईई अ‍ॅडवान्सचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आपला निकाल jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात. हा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना आपला अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख टाकावी लागणार आहे. एनटीएकडून बीटेकचे निकाल आधीच जाहीर करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव