मराठा आरक्षण मिळेपर्यंत हार घालणार नाही : पंकजा मुंडे


पंकजा मुंडेंची राज्य सरकारवर टीका




बीड (प्रतिनिधी): मराठा आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त भगवान गडावर आयोजित मेळाव्यात शुक्रवारी जाहीर केले. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण सर्वांसाठी मी आवाज उठवणार आहे असं जाहीर करताना पंकजा मुंडे यांनी मराठा समाज-ओबीसी समाजात भांडण लावल्याचं कटकारस्थान रचलं जात आहे असा आरोप केला. दोन्ही मिळूनच बहुजन समाज आहे सांगताना त्यांनी एकत्र आणून वज्रमूट करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितले. याआधी ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा नेसणार नसल्याचे पंकजा यांनी जाहीर केलं होतं.


राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांवर अत्याचर, बलात्कार होत आहेत…. महिलांकडे वाकडी नजर करुन जरी पाहिलं तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमी आहे. हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे. राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही…आरोपींवर बोलायचं नाही. सरकार जर असं काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही?,” अशी विचारणा पंकजा मुंडेंनी केली.


सरकारने नुसतं पॅकेज जाहीर करुन चालणार नाही, प्रत्येकाच्या हातात मदत द्यावी आणि दिवाळी गोड करावी. फक्त मोदींचे तेवढे पैसे येत आहेत. पण राज्य सरकारचे, पालकमंत्र्यांचे आले का? पण असं काही बोललं की यांना राग येतो. आता तुम्ही सत्तेत आहात तर तुम्हाला विचारणार ना…तुम्ही विरोधात होता तेव्हा तर धमक्या देत होतात,” अशी टीका पंकजा मुंडेंनी केली. “आता काय बीड जिल्ह्याची आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था आहे. एक रुपया तरी आहे का? माझ्याच योजना चालू आहे. आपलं मंत्रीपद भाड्याने देऊन टाकलं आहे यांनी. यांचं काहीच चालत नाही. आमचं म्हणणं आहे तुम्ही जनतेच्या हिताचं काम करा आम्ही जाहीर अभिनंदन करु,” असं म्हणत पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.


'पंकजाताई घरात बसल्या आहेत म्हणून खूश झालेल्यांनी माझा दौरा लिहून घ्या. मी दिल्ली, नवी मुंबई, नाशिकचा दौरा करणार आहे. तसेच ऊसाच्या फडात जाऊन संवाद साधणार आहे,' असे मुंडे यांनी सांगितले. तसेच दौऱ्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, महिलांची सुरक्षा, शेतकऱ्यांना मिळणारी अतिवृष्टी मदत, ऊसतोड कामगार आणि शेतमजूर हे विषय मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.


महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर


राज्यात महिलांवर अत्याचार, बलात्कार होत असल्यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांकडे वाकडी नजर करून जरी पाहिले तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमिका आहे. अशांना हत्तीच्या पायाखाली दिले पाहिजे. राज्यात काय चालले आहे? त्यावर बोलायचे नाही...आरोपींवर बोलायचे नाही. जर सरकार असे काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही? अशी विचारसरणी पंकजा मुंडे यांनी केली.


पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फक्त मोदींचे हात पुढे सरसावत आहेत. परंतु, राज्य सरकार आणि पालकमंत्र्यांचे काय? असे काही बोलले तर त्यांना राग येतो. विरोधात असताना तुमच्या धमक्या येत होत्या तर आता सत्तेत आहात तर तुम्हाला विचारणार ना...अशी टीका मुंडे यांनी केली. तसेच पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करून नाही तर, पूरग्रस्तांच्या हातात मदत देऊन त्यांची दिवाळी गोड करावी असे त्या म्हणाल्या.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या