राज्याने ओलांडला ९ कोटी लसीकरणाचा टप्पा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरू आहे. राज्याने आतापर्यंत ९ कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २.७६ कोटी आहे. ही संख्या देशातील इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे अपर मुख्य सचिव डॉ. व्यास यांनी सांगितले.


राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी 'कवच कुंडले अभियान' राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारकडून देशभरात येत्या १५ तारखेपर्यंत शंभर कोटी नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी 'कवच कुंडले' अभियानामध्ये सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांना एकत्रित करून लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे.



राज्यात २३८४ नवे रुग्ण


गुरुवारी राज्यात २३८४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६५ लाख ८६ हजार २८० वर पोहोचला आहे, तर गुरुवारी ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १ लाख ३९ हजार ७०५ वर पोहोचला आहे.


गुरुवारी २ हजार ३४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा ६४ लाख १३ हजार ४१८ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९७.३८ टक्के, तर मृत्यूदर २.१२ टक्के आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर २ ते ३ हजारांदरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गुरूवारी १४ ऑक्टोबरला २ हजार ३८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ३५ मृत्यूंची नोंद झाली असून २ हजार ३४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.३८ टक्के तर मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे

Comments
Add Comment

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत