राज्याने ओलांडला ९ कोटी लसीकरणाचा टप्पा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरू आहे. राज्याने आतापर्यंत ९ कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २.७६ कोटी आहे. ही संख्या देशातील इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे अपर मुख्य सचिव डॉ. व्यास यांनी सांगितले.


राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी 'कवच कुंडले अभियान' राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारकडून देशभरात येत्या १५ तारखेपर्यंत शंभर कोटी नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी 'कवच कुंडले' अभियानामध्ये सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांना एकत्रित करून लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे.



राज्यात २३८४ नवे रुग्ण


गुरुवारी राज्यात २३८४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६५ लाख ८६ हजार २८० वर पोहोचला आहे, तर गुरुवारी ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १ लाख ३९ हजार ७०५ वर पोहोचला आहे.


गुरुवारी २ हजार ३४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा ६४ लाख १३ हजार ४१८ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९७.३८ टक्के, तर मृत्यूदर २.१२ टक्के आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर २ ते ३ हजारांदरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गुरूवारी १४ ऑक्टोबरला २ हजार ३८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ३५ मृत्यूंची नोंद झाली असून २ हजार ३४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.३८ टक्के तर मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे