कोळशाच्या खाणींच्या लिलावाचा पुढील टप्पा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पहिल्या दोन टप्प्यात २८ कोळशाच्या खाणींचा यशस्वी लिलाव केल्यानंतर, कोळसा मंत्रालयाने ४० नवीन कोळसा खाणींची (कोळसा खाणी विशेष तरतूद कायद्यांतर्गत २१ नवीन खाणी आणि एमएमडीआर कायद्याच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत १९ नवीन खाणी) लिलाव प्रक्रिया सुरू केली . यापूर्वीच्या टप्प्यातील कोळशाच्या खाणी धरून एकूण ८८ कोळसा खाणी लिलावासाठी उपलब्ध केल्या जातील. दरम्यान, आत्मनिर्भर भारतासाठी आयात कमी करण्यावर भर असल्याचे केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशीयांनी सांगितले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोळसा मंत्रालय आणि केंद्र सरकार कोळसा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी संसाधने खुली करत आहेत. कोकिंग कोल ब्लॉक्ससाठी प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले. या उपाययोजनांमुळे संभाव्य बोलीदारांचा सहभाग वाढण्यास मदत होईल, असे जोशी म्हणाले. दरम्यान, कोळसा क्षेत्र पाच ट्रिलियन डॉलर्सच्या भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यात मोठी भूमिका बजावेल, असे कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पटेल दानवे यांनी सांगितले.



कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील


सर्व उपलब्ध स्रोतांकडून औष्णिक विद्युतउत्पादन केंद्रांकडे येणारा कोळसा पुरवठा वाढल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कोल इंडिया लिमिटेडसह इतर स्रोतांकडून होणारा एकूण कोळसा पुरवठा दोन दशलक्ष टनांपेक्षा जास्त नोंदवल्याचे मंत्र्यांनी केला आहे. विद्युत उत्पादन केंद्रांकडे पुरेसा कोळसा साठा असावा म्हणून या केंद्राकडे अधिक कोळशाचा पुरवठा व्हावा याची काळजी घेतली जाईल असेही जोशी यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी