राज्यात पुढील ४ दिवसांत मेघ गर्जनासह मुसळधार पाऊस

मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात झाला. आता पुन्हा हवामान खात्याने येत्या १६ ते १८ ऑक्टोबरपासून मेघ गर्जनासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.


हवामान खात्याने विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, अकोला, बुलडाणा, हिंगोली, भंडारा, गडचिरोली, लातूर, परभणी, यवतमाळ, गोंदिया, नांदेड या पंधरा जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जाहिर केला आहे. महाराष्ट्रातील काही भागांत परतीचा पाऊस सुरू झाला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी शेतीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिले आहेत.

Comments
Add Comment

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या

पुण्यातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार

ब्रिटनस्थित ‘टी४ एज्युकेशन’ संस्थेने जालिंदरनगर (ता.खेड, जि. पुणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘२०२५

What is E-Bond : आजपासून 'कागदी बाँड' हद्दपार! महसूलमंत्र्यांच्या निर्णयामुळे ई-बॉण्डची एन्ट्री; वाचा काय आहे ई-बॉण्ड?

मुंबई : महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला