आपट्याच्या पानातून साजरा होतोय, आदिवासींचा सोनियाचा दिन

शिवाजी पाटील


शहापूर : दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, आपल्या सर्वांच्या जीवनात परिवर्तनाचे व आनंदाचे क्षण आणणारा दसरा हा सण साजरा करण्यासाठी आपट्यांच्या पानांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शहापूरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील आदिवासी बांधव आपट्यांची पाने गोळा करण्यासाठी वणवण भटकत असतात. रोजंदारीचा दुष्काळ असलेल्या या सिझनमध्ये ही तुटपुंजी कमाई त्यांच्या दसऱ्याच्या सणाला अगदी आनंदाचा हातभार लावताना दिसते.



धार्मिक, आयुर्वेदिक महत्त्व असलेली ही पवित्र पाने आपणापर्यंत पोहोचविणाऱ्या आदिवासी बांधवांच्या जीवनात मात्र पानांपासून मिळणारी मिळकतच आनंद निर्माण करत असते. त्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठीही तेच पुढाकार घेतात, निसर्गाचे रक्षण करतात म्हणूनच त्यांना निसर्गही भरभरून देत असल्याचा प्रत्यय दसरा सणाच्या निमित्ताने येतो. दसरा सणानिमित्त बाजारात आपट्याच्या पानांची गर्दी केली असली तरी ही सोनपत्ती आणण्यासाठी आदिवासी बांधव आपल्या कुटुंबासह शहापूरात असलेल्या उपजत जंगलातीलआपट्यांची पाने गोळा करण्यासाठी भटकंती करत असतात.


अगदी दिवसभरात जेवढे हाती लागेल तेवढीच पाने जमा करून त्यांचे गठ्ठे बांधतात आणि सणाच्या आगोदरच्या दिवशी ही पाने घेऊन कसारा, खर्डी, आटगांव, तानशेत, उंबरमाळी, वासिंद, आसनगांव खडावली स्थानकातून कल्याण, ठाणे, दादर व उपनगरात रात्रीच्या वेळेत घेऊन जातात. संपूर्ण रात्र एखाद्या फुटपाथवर अथवा पादचारी उड्डाणपुलाखाली काढून पहाटेच्या वेळेत ती व्यापाऱ्यांना विकतात. अनेक वेळा व्यापारी मागेल त्या नाममात्र किमतीत विकून परतीचा मार्ग शोधत आपल्या कुटुंबाकडे जातात़ मात्र रोजंदारीचा दुष्काळ असलेल्या या सिझनमध्ये ही तुटपुंजी कमाई त्यांच्या दसऱ्याच्या सणाला अगदी आनंदाचा हातभार लावत असल्याचे भातसा परिसरातील आदिवासी बांधव सांगतात.

Comments
Add Comment

कृत्रिम फुले आणि खेळण्यांच्या रंगांमुळे कर्करोगाचा धोका; विक्रम पाचपुते यांचा इशारा

मुंबई: विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी एक गंभीर

Holi Special ST Buses : होळीसाठी धावणार एसटीच्या १९३ बस; महामंडळातर्फे विशेष सेवा जारी

मुंबई : राज्यभरात होळीच्या सणाची तयारी सुरु झालीये. देवांच्या पालख्या घरोघरी येऊ लागल्या आहेत, त्यामुळे

प्रकल्प स्मार्ट अंतर्गत मुंबई - अहमदाबाद उच्चगती रेल्वे स्थानक क्षेत्र विकासाला एमएमआरडीएची गती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे

मराठीला रोजगार आणि जागतिक ओळखीची भाषा बनवणार - मराठी संवर्धनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : मराठी ही केवळ संस्कृतीची नव्हे तर अर्थकारण आणि रोजगाराचीही भाषा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे

Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट, काय म्हणाले?

मुंबई: आज 'मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट लिहित मराठीजनांना,

Anil Ambani : अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; ईडीनंतर सीबीआयकडून कार्यालय आणि निवासस्थानी शोधमोहीम सुरु

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने म्हणजेच सीबीआयने मेसर्स रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या विरोधात दुसरा गुन्हा नोंदवला