आपट्याच्या पानातून साजरा होतोय, आदिवासींचा सोनियाचा दिन

शिवाजी पाटील


शहापूर : दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, आपल्या सर्वांच्या जीवनात परिवर्तनाचे व आनंदाचे क्षण आणणारा दसरा हा सण साजरा करण्यासाठी आपट्यांच्या पानांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शहापूरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील आदिवासी बांधव आपट्यांची पाने गोळा करण्यासाठी वणवण भटकत असतात. रोजंदारीचा दुष्काळ असलेल्या या सिझनमध्ये ही तुटपुंजी कमाई त्यांच्या दसऱ्याच्या सणाला अगदी आनंदाचा हातभार लावताना दिसते.



धार्मिक, आयुर्वेदिक महत्त्व असलेली ही पवित्र पाने आपणापर्यंत पोहोचविणाऱ्या आदिवासी बांधवांच्या जीवनात मात्र पानांपासून मिळणारी मिळकतच आनंद निर्माण करत असते. त्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठीही तेच पुढाकार घेतात, निसर्गाचे रक्षण करतात म्हणूनच त्यांना निसर्गही भरभरून देत असल्याचा प्रत्यय दसरा सणाच्या निमित्ताने येतो. दसरा सणानिमित्त बाजारात आपट्याच्या पानांची गर्दी केली असली तरी ही सोनपत्ती आणण्यासाठी आदिवासी बांधव आपल्या कुटुंबासह शहापूरात असलेल्या उपजत जंगलातीलआपट्यांची पाने गोळा करण्यासाठी भटकंती करत असतात.


अगदी दिवसभरात जेवढे हाती लागेल तेवढीच पाने जमा करून त्यांचे गठ्ठे बांधतात आणि सणाच्या आगोदरच्या दिवशी ही पाने घेऊन कसारा, खर्डी, आटगांव, तानशेत, उंबरमाळी, वासिंद, आसनगांव खडावली स्थानकातून कल्याण, ठाणे, दादर व उपनगरात रात्रीच्या वेळेत घेऊन जातात. संपूर्ण रात्र एखाद्या फुटपाथवर अथवा पादचारी उड्डाणपुलाखाली काढून पहाटेच्या वेळेत ती व्यापाऱ्यांना विकतात. अनेक वेळा व्यापारी मागेल त्या नाममात्र किमतीत विकून परतीचा मार्ग शोधत आपल्या कुटुंबाकडे जातात़ मात्र रोजंदारीचा दुष्काळ असलेल्या या सिझनमध्ये ही तुटपुंजी कमाई त्यांच्या दसऱ्याच्या सणाला अगदी आनंदाचा हातभार लावत असल्याचे भातसा परिसरातील आदिवासी बांधव सांगतात.

Comments
Add Comment

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी