आपट्याच्या पानातून साजरा होतोय, आदिवासींचा सोनियाचा दिन

शिवाजी पाटील


शहापूर : दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, आपल्या सर्वांच्या जीवनात परिवर्तनाचे व आनंदाचे क्षण आणणारा दसरा हा सण साजरा करण्यासाठी आपट्यांच्या पानांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शहापूरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील आदिवासी बांधव आपट्यांची पाने गोळा करण्यासाठी वणवण भटकत असतात. रोजंदारीचा दुष्काळ असलेल्या या सिझनमध्ये ही तुटपुंजी कमाई त्यांच्या दसऱ्याच्या सणाला अगदी आनंदाचा हातभार लावताना दिसते.



धार्मिक, आयुर्वेदिक महत्त्व असलेली ही पवित्र पाने आपणापर्यंत पोहोचविणाऱ्या आदिवासी बांधवांच्या जीवनात मात्र पानांपासून मिळणारी मिळकतच आनंद निर्माण करत असते. त्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठीही तेच पुढाकार घेतात, निसर्गाचे रक्षण करतात म्हणूनच त्यांना निसर्गही भरभरून देत असल्याचा प्रत्यय दसरा सणाच्या निमित्ताने येतो. दसरा सणानिमित्त बाजारात आपट्याच्या पानांची गर्दी केली असली तरी ही सोनपत्ती आणण्यासाठी आदिवासी बांधव आपल्या कुटुंबासह शहापूरात असलेल्या उपजत जंगलातीलआपट्यांची पाने गोळा करण्यासाठी भटकंती करत असतात.


अगदी दिवसभरात जेवढे हाती लागेल तेवढीच पाने जमा करून त्यांचे गठ्ठे बांधतात आणि सणाच्या आगोदरच्या दिवशी ही पाने घेऊन कसारा, खर्डी, आटगांव, तानशेत, उंबरमाळी, वासिंद, आसनगांव खडावली स्थानकातून कल्याण, ठाणे, दादर व उपनगरात रात्रीच्या वेळेत घेऊन जातात. संपूर्ण रात्र एखाद्या फुटपाथवर अथवा पादचारी उड्डाणपुलाखाली काढून पहाटेच्या वेळेत ती व्यापाऱ्यांना विकतात. अनेक वेळा व्यापारी मागेल त्या नाममात्र किमतीत विकून परतीचा मार्ग शोधत आपल्या कुटुंबाकडे जातात़ मात्र रोजंदारीचा दुष्काळ असलेल्या या सिझनमध्ये ही तुटपुंजी कमाई त्यांच्या दसऱ्याच्या सणाला अगदी आनंदाचा हातभार लावत असल्याचे भातसा परिसरातील आदिवासी बांधव सांगतात.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती