दिल्लीसाठी जेतेपद दूरच

शारजा (वृत्तसंस्था) : साखळीमध्ये चमकदार खेळ करणाऱ्या ऋषभ पंतचा संघ बाद फेरीत ढेपाळला आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएल जेतेपद दूर राहिले. क्वॉलिफायर २मध्ये बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून तीन विकेट आणि एका चेंडूंने पराभूत व्हावे लागल्याने गतउपविजेता दिल्लीला सलग दुसऱ्या खेपेस फायनल प्रवेशापासून वंचित राहावे लागले.


दिल्लीने गत हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांचे काहीच चालले नाही. त्यामुळे पहिल्यांदा फायनल गाठूनही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सुरुवातीला श्रेयस अय्यर त्यानंतर रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीने १४पैकी १० सामने जिंकताना २० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. यंदाच्या हंगामात केवळ त्यांना डबल फिगर सामने जिंकता आले. गुणतालिकेत टॉपला असल्याने दिल्ली दिमाखात अंतिम फेरी गाठणार, असे वाटत होते. मात्र, चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. दुसऱ्या प्रयत्नात कोलकात्याविरुद्ध फलंदाजांनी चुका न सुधारल्याने दिल्लीचे आव्हान प्ले-ऑफ फेरीत संपुष्टात आले.


गोलंदाजांनी गाजवलेल्या लढतीत बुधवारी दिल्लीचे १३६ धावांचे आव्हान गाठताना कोलकात्याला घाम गाळावा लागला. शुबमन गिल (४६ चेंडूंत ४६ धावा) तसेच वेंकटेश अय्यरमुळे (४१ चेंडूंत ५५ धावा) दमदार सुरुवात करताना १२.२ षटकांत ९६ धावांची सलामी दिली. मात्र, पुढील ४० धावा करण्यासाठी ८.२ षटके लागली. नितीश राणाने १३ तसेच राहुल त्रिपाठीने नाबाद १२ धावा करताना खेळपट्टीवर थांबण्याचा प्रयत्न केला तरी, यष्टिरक्षक दिनेश कार्तिक, कर्णधार इयॉन मॉर्गनसह अष्टपैलू शाकीब अल हसन तसेच सुनील नरिन यांना खाते खोलता न आल्याने सामन्यांत रंगत वाढली.


कॅगिसो रबाडा, अॅन्रिच नॉर्टजे आणि अवेश खान या वेगवान त्रिकुटासह ऑफस्पिनर आर. अश्विनने अचूक मारा करताना नाईट रायडर्सच्या नाकीनऊ आणले. शेवटच्या षटकात ७ धावांची गरज होती. त्यात अनुभवी अश्विनने पहिल्या ४ चेंडूंत २ विकेट घेताना केवळ एक धाव दिल्याने दिल्लीचे पारडे जड झाले. मात्र, २ चेंडूत विजयासाठी ६ धावांची गरज असताना त्रिपाठीने अश्विनच्या पाचव्या चेंडूला त्याच्या डोक्यावरून सीमारेषेपार फेकून देत सामना संपवला.


दिल्लीच्या गोलंदाजांनी विजयासाठी कसोशीने प्रयत्न केले तरी दिल्लीच्या फलंदाजांनाही अपेक्षित खेळ करता आला नाही. त्यांच्या पाच फलंदाजांना दोन आकडी धावा करता आल्या. त्यात डावखुरा सलामीवीर शिखर धवनचे सर्वाधिक ३६ धावांचे योगदान होते. त्यानंतर श्रेयस अय्यरमुळे (२७ चेंडूंत नाबाद ३० धावा) कॅपिटल्सना निर्धारित २० षटकांत ५ बाद १३५ धावांची मजल मारता आली.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या