देशमुखांवरील चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशाने


फडणवीस यांचा पवारांवर पलटवार




मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली. न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या सरकारने सीबीआयने चौकशीच करू नये, असे सांगितल्याने ज्यांनी देशाचे पैसे बुडविले, अशी बँक फसवणुकीची ८० प्रकरणे धुळखात पडून आहेत. आता उच्च न्यायालयावरसुद्धा यांचा विश्वास नाही काय, असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला.


जालियनवाला बागचा गोळीबार पोलिसांनी केला असला तरी त्यावेळी आदेश ब्रिटिशांच्या गव्हर्नर जनरल यांचे होते. अगदी तसेच मावळचा गोळीबार पोलिसांनी केला तरी त्यांना आदेश तेव्हाच्या राज्यकर्त्यांचे होते. त्यामुळे मावळ गोळीबारची घटनासुद्धा जालियनवाला बागसारखीच घटना आहे, असे प्रत्त्युत्तर त्यांनी दिले.


शरद पवारांची पत्रकार परिषद कशासाठी होती, हेच लक्षात आले नाही. ते अनेक विषयांवर बोलले. उत्तर प्रदेशच्या घटनेवर महाराष्ट्रात बंद केला जातो आणि तोही सर्व यंत्रणांचा वापर करीत, संपूर्ण दडपशाही करून. या बंददरम्यान, पहिल्यांदा असे घडले की पोलीस संरक्षणात लोकांवर दबाव आणला गेला आणि त्यांना धमकावून बंद केला गेला. हा बंद किती ‘शांतते’त झाला, हे आता लक्षात येते. राज्यपुरस्कृत भीती निर्माण करून केलेला हा बंद होता.


शिवसेना बंदमध्ये सामिल झाली तर काय होते, हे स्वत: शरद पवार यांनीच सांगितले, ही तशी समाधानाची बाब आहे. पोलिस संरक्षणात मारहाण, धमक्या, दुकानांमधील माल लुटून नेणे चालू होते आणि पोलिस बघ्याची भूमिका घेत होते, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

Mumbai Port : मुंबई बंदर होणार 'प्रदूषणमुक्त'! JNPA मध्ये हायटेक सुविधा, मालवाहतूक होणार सुपरफास्ट...मुंबई बंदराने काढली पहिली निविदा

मुंबई : वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाचे संकट लक्षात घेता, मुंबई बंदर प्राधिकरणाने 'हरित बंदर' (Green Port) बनण्याच्या

आज मतदानदिनी मेट्रो-३ मध्यरात्रीपर्यंत धावणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आज १५ जानेवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई सज्ज झाली आहे.

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१