देशमुखांवरील चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशाने


फडणवीस यांचा पवारांवर पलटवार




मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली. न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या सरकारने सीबीआयने चौकशीच करू नये, असे सांगितल्याने ज्यांनी देशाचे पैसे बुडविले, अशी बँक फसवणुकीची ८० प्रकरणे धुळखात पडून आहेत. आता उच्च न्यायालयावरसुद्धा यांचा विश्वास नाही काय, असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला.


जालियनवाला बागचा गोळीबार पोलिसांनी केला असला तरी त्यावेळी आदेश ब्रिटिशांच्या गव्हर्नर जनरल यांचे होते. अगदी तसेच मावळचा गोळीबार पोलिसांनी केला तरी त्यांना आदेश तेव्हाच्या राज्यकर्त्यांचे होते. त्यामुळे मावळ गोळीबारची घटनासुद्धा जालियनवाला बागसारखीच घटना आहे, असे प्रत्त्युत्तर त्यांनी दिले.


शरद पवारांची पत्रकार परिषद कशासाठी होती, हेच लक्षात आले नाही. ते अनेक विषयांवर बोलले. उत्तर प्रदेशच्या घटनेवर महाराष्ट्रात बंद केला जातो आणि तोही सर्व यंत्रणांचा वापर करीत, संपूर्ण दडपशाही करून. या बंददरम्यान, पहिल्यांदा असे घडले की पोलीस संरक्षणात लोकांवर दबाव आणला गेला आणि त्यांना धमकावून बंद केला गेला. हा बंद किती ‘शांतते’त झाला, हे आता लक्षात येते. राज्यपुरस्कृत भीती निर्माण करून केलेला हा बंद होता.


शिवसेना बंदमध्ये सामिल झाली तर काय होते, हे स्वत: शरद पवार यांनीच सांगितले, ही तशी समाधानाची बाब आहे. पोलिस संरक्षणात मारहाण, धमक्या, दुकानांमधील माल लुटून नेणे चालू होते आणि पोलिस बघ्याची भूमिका घेत होते, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य