नेरुळ, सिवूड रेल्वे स्थानक परिसरात अवैध फेरीवाल्यांचा उच्छाद

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नेरूळ व सिवूड रेल्वे स्थानक परिसरात जुन्या व नव्या अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढला असून नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे.


विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आमदार गणेश नाईक यांनी मनपा आयुक्तांना इशारा दिला असतानाही फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली निघत नाही. म्हणून या दोन्हीही रेल्वेस्थानकाच्या शेजारी नव्याने अवैधपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी भाजप महिला मोर्च्याच्या सरचिटणीस अॅड. मंगल घरत यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.


नेरूळ व सिवूड येथील रेल्वेस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. रात्रीच्या वेळी तर नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात व आवारात तर अनेक अवैध धंदे बिनदिक्कतपणे सुरू असतात. अवैध फेरीवाल्यांच्या दहशतीला मागे ठाणे येथील घटनेमुळे नागरिक घाबरूनच असतात. यामुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी भीती असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.


सिवूड रेल्वे स्थानकाशेजारी असणाऱ्या डी मार्ट समोर अनेक फेरीवाले बस्तान ठोकतात. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न नित्याचाच झाला आहे. रहदारीलादेखील अडथळा निर्माण होत आहे. या समस्येमुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत ताबडतोब फेरीवाल्यांची वर्गवारी करून अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशीही विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.


नेरूळ व सिवूड रेल्वे स्थानक परिसरात काही फेरीवाले पूर्वपार काळापासून व्यवसाय करत आहेत. त्यांना त्यांचा कायदेशीर अधिकार मिळणे गरजेचे आहे. म्हणून नवीन व जुने फेरीवाले अशी वर्गवारी करून नव्या अवैध फेरीवाल्यांवर कारवाई करावी. - मंगल घरत, सरचिटणीस, महिला मोर्चा, भाजप, नवी मुंबई

Comments
Add Comment

भारत आणि इटली यांच्यातील सांस्कृतिक सेतूची उभारणी कारावाज्‍जो, रावबहादूर महादेव विश्‍वनाथ धुरंधर यांच्या चित्रप्रदर्शनातून

मुंबई (खास प्रतिनिधी) : कला आणि चित्रांच्या माध्यमातून प्रत्येक देशाची संस्कृती, सामाजिक जाणीव, इतिहास आणि

निवडणूक आयुक्त म्हणतात, मतदार यादीत बदल करणं 'आमचं कामच नाही'!

सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण मुंबई: स्थानिक स्वराज्य

सागरी विकासाची नवी दिशा! ‘इंडिया मेरीटाईम वीक’मुळे महाराष्ट्राला जागतिक ओळख

२७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नेस्को, गोरेगाव येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’चे आयोजन मुंबई : भारतीय सागरी क्षेत्राच्या

गोरेगाव गोकुळधामसह आसपासच्या परिसरात अपुरा पाणी पुरवठा, नागरिकांना टँकरने मागण्याची आली वेळ

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव गोकुळधाम येथील भागांमध्ये मागील काही दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाण्याची

स्वच्छ भारतात महाराष्ट्र अग्रस्थानी! – महिला गट, संस्था घेणार पुढाकार : मेघना बोर्डीकर

मुंबई : राज्यात स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबवताना स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग

मुंबई दिवाळीच्या सणापूर्वीच अधिक स्वच्छ राखण्यावर महापालिकेचा भर, बुधवारपासून असा घेतला हाती उपक्रम

मुंबई (खास प्रतिनिधी) : दिवाळीचा सण आला की आपण घरातील जळमटे काढून घरात स्वच्छता करतो, नको असलेल्या वस्तू फेकून देता