कल्याणमध्ये इमारतीचा लोखंडी रॅम्प पडून ९ घरांचे नुकसान

कल्याण (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजनजीक कोकण वसाहतीच्या चाळीच्या रूमवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रॅम्प ९ रूमवर पडल्याने या रूमचे पत्रे फुटले तसेच दोन रूमवर आंब्याचे झाड कोसळल्याने या रूमचे देखील पत्रे फुटल्याची घटना घडली. सुदैवाने देवबलवत्तर असल्याने जीवितहानी झाली नाही. घराचे पत्रे फुटल्याने ११ कुटुबीयांचे संसार उघड्यावर आले आहेत.


मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कल्याणमधील बिर्ला कॉलेजनजीक कोकण वसाहत चाळ नं. ३३ च्या ९ खोल्यांवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रॅम्प संध्याकाळी ८च्या दरम्यान कोसळला. या घटनेत सुमारे ९ खोल्यांच्या छप्परांचे पत्रे फुटले, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.


वंदना शिर्के, दीपक सुर्वे, वसंती कदम, दिंगबर चिंदरकर, संतोष सुर्वे, दिलीपकुमार चव्हाण, रंजना खरात, जयनंद कुंदर



9 houses damaged due to iron ramp of building in Kalyan

, राजू उपाध्याय यांच्या घरांचे पत्रे तुटल्याने ऐन दसरा सणाच्या तोंडावर संसार उघाड्यावर पडले आहेत, तर त्याच परिसरात आंब्याचे झाड पडल्याने अभय धनावडे, श्रीपाद कुलकर्णी यांच्या खोल्यांचे पत्रे फुटले.


कल्याण तहसीलदार विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटनास्थळी पंचनामे करण्यासाठी पाठविले असून पंचनामे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून त्यांना लवकर मदत होईल, याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तर ‘ब’ प्रभागक्षेत्र अधिकारी जगताप यांनी घटनास्थळी बुधवारी अग्निशमन दलाच्या मदतीने पडलेले झाड काढण्याचे काम सुरू केले, असे सांगितले.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात