कल्याणमध्ये इमारतीचा लोखंडी रॅम्प पडून ९ घरांचे नुकसान

कल्याण (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजनजीक कोकण वसाहतीच्या चाळीच्या रूमवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रॅम्प ९ रूमवर पडल्याने या रूमचे पत्रे फुटले तसेच दोन रूमवर आंब्याचे झाड कोसळल्याने या रूमचे देखील पत्रे फुटल्याची घटना घडली. सुदैवाने देवबलवत्तर असल्याने जीवितहानी झाली नाही. घराचे पत्रे फुटल्याने ११ कुटुबीयांचे संसार उघड्यावर आले आहेत.


मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कल्याणमधील बिर्ला कॉलेजनजीक कोकण वसाहत चाळ नं. ३३ च्या ९ खोल्यांवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रॅम्प संध्याकाळी ८च्या दरम्यान कोसळला. या घटनेत सुमारे ९ खोल्यांच्या छप्परांचे पत्रे फुटले, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.


वंदना शिर्के, दीपक सुर्वे, वसंती कदम, दिंगबर चिंदरकर, संतोष सुर्वे, दिलीपकुमार चव्हाण, रंजना खरात, जयनंद कुंदर



9 houses damaged due to iron ramp of building in Kalyan

, राजू उपाध्याय यांच्या घरांचे पत्रे तुटल्याने ऐन दसरा सणाच्या तोंडावर संसार उघाड्यावर पडले आहेत, तर त्याच परिसरात आंब्याचे झाड पडल्याने अभय धनावडे, श्रीपाद कुलकर्णी यांच्या खोल्यांचे पत्रे फुटले.


कल्याण तहसीलदार विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटनास्थळी पंचनामे करण्यासाठी पाठविले असून पंचनामे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून त्यांना लवकर मदत होईल, याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तर ‘ब’ प्रभागक्षेत्र अधिकारी जगताप यांनी घटनास्थळी बुधवारी अग्निशमन दलाच्या मदतीने पडलेले झाड काढण्याचे काम सुरू केले, असे सांगितले.

Comments
Add Comment

लालबागचा राजा नव्हे... देणगीच्या बाबतीत 'हा' गणपती मुंबईत आघाडीवर, ५ दिवसांत मिळाली १५ कोटींची देणगी

मुंबई: दरवर्षी, मुंबईतील किंग सर्कलमधील गौड सारस्वत ब्राह्मणांच्या (जीएसबी) गणपती मंडळात पाच दिवस गणेशोत्सव

मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरमुळे ओबीसी समाजाचे अस्तित्व धोक्यात! ओबीसी नेत्यांचे ठरले

न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईसाठी ओबीसी संघटनांची तयारी मुंबई: राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण

गोराई बीचवर भरतीच्या लाटेत बस गेली वाहून, प्रवाशांचं काय झालं पहा...

मुंबई: गोराई बीचवर सोमवारी एक थरारक घटना घडली. एक मिनीबस भरतीमुळे समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याने घबराट

गुजरातहून आणलेल्या तराफामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले, कोळी बांधव संतापले

मुख्यमंत्र्यांकडे केली कठोर कारवाईची मागणी मुंबई: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा विलंब

MahaRERA : बाधित घर खरेदीदारांना दिलासा; ५,२६७ तक्रारी निकाली, भविष्यातील फसवणूक रोखण्यासाठी महारेराचे कठोर पाऊल

मुंबई: राज्यातील घर खरेदीदारांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी महारेरा (MahaRERA) प्रशासनाने मोठी मोहीम हाती

MRVC Vande Metro AC Local : मुंबईकरांनो आता गारेगार प्रवास करा! गर्दीतही आरामदायी अन् वेगवान, मुंबई लोकलमध्ये एसी डबे होणार लवकरच सुरू

मुंबई : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर प्रवाशांना अधिक