कल्याणमध्ये इमारतीचा लोखंडी रॅम्प पडून ९ घरांचे नुकसान

  54

कल्याण (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजनजीक कोकण वसाहतीच्या चाळीच्या रूमवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रॅम्प ९ रूमवर पडल्याने या रूमचे पत्रे फुटले तसेच दोन रूमवर आंब्याचे झाड कोसळल्याने या रूमचे देखील पत्रे फुटल्याची घटना घडली. सुदैवाने देवबलवत्तर असल्याने जीवितहानी झाली नाही. घराचे पत्रे फुटल्याने ११ कुटुबीयांचे संसार उघड्यावर आले आहेत.


मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कल्याणमधील बिर्ला कॉलेजनजीक कोकण वसाहत चाळ नं. ३३ च्या ९ खोल्यांवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रॅम्प संध्याकाळी ८च्या दरम्यान कोसळला. या घटनेत सुमारे ९ खोल्यांच्या छप्परांचे पत्रे फुटले, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.


वंदना शिर्के, दीपक सुर्वे, वसंती कदम, दिंगबर चिंदरकर, संतोष सुर्वे, दिलीपकुमार चव्हाण, रंजना खरात, जयनंद कुंदर



9 houses damaged due to iron ramp of building in Kalyan

, राजू उपाध्याय यांच्या घरांचे पत्रे तुटल्याने ऐन दसरा सणाच्या तोंडावर संसार उघाड्यावर पडले आहेत, तर त्याच परिसरात आंब्याचे झाड पडल्याने अभय धनावडे, श्रीपाद कुलकर्णी यांच्या खोल्यांचे पत्रे फुटले.


कल्याण तहसीलदार विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटनास्थळी पंचनामे करण्यासाठी पाठविले असून पंचनामे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून त्यांना लवकर मदत होईल, याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तर ‘ब’ प्रभागक्षेत्र अधिकारी जगताप यांनी घटनास्थळी बुधवारी अग्निशमन दलाच्या मदतीने पडलेले झाड काढण्याचे काम सुरू केले, असे सांगितले.

Comments
Add Comment

Kabutar Khana : "कबुतरप्रेमींना मोठा धक्का! दाणापाण्यावर बंदी कायम; कोर्टाचा स्पष्ट आदेश"

मुंबई : मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या

पहिलीपासून विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा,