'आज वसूली चालू आहे की बंद?'

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला. त्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र बंद विरोधात राज्य सरकारवर टीका केली आहे. 'कोणी मला माहिती देऊ शकेल का, की आज वसूली चालू आहे की बंद?' असे ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र बंद नाही असा हॅशटॅगही दिला आहे.


https://twitter.com/fadnavis_amruta/status/1447481634224173061?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1447481634224173061%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Famrita-fadnavis-criticizes-the-government-over-the-maharashtra-bandh-abn-97-2626205%2F

हे सुद्धा वाचा - महाराष्ट्र बंदला भाजपचा विरोध


लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी चालवली. या घटनेविरोधात महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे,' अशी टीका राज्य सरकारवर केली आहे. तसेच या घटनेबद्दल तिथले सरकार दोषींवर कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध