'आज वसूली चालू आहे की बंद?'

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला. त्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र बंद विरोधात राज्य सरकारवर टीका केली आहे. 'कोणी मला माहिती देऊ शकेल का, की आज वसूली चालू आहे की बंद?' असे ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र बंद नाही असा हॅशटॅगही दिला आहे.


https://twitter.com/fadnavis_amruta/status/1447481634224173061?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1447481634224173061%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Famrita-fadnavis-criticizes-the-government-over-the-maharashtra-bandh-abn-97-2626205%2F

हे सुद्धा वाचा - महाराष्ट्र बंदला भाजपचा विरोध


लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी चालवली. या घटनेविरोधात महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे,' अशी टीका राज्य सरकारवर केली आहे. तसेच या घटनेबद्दल तिथले सरकार दोषींवर कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात