मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला. त्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र बंद विरोधात राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘कोणी मला माहिती देऊ शकेल का, की आज वसूली चालू आहे की बंद?’ असे ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र बंद नाही असा हॅशटॅगही दिला आहे.
लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी चालवली. या घटनेविरोधात महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे,’ अशी टीका राज्य सरकारवर केली आहे. तसेच या घटनेबद्दल तिथले सरकार दोषींवर कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…
मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…
मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…