हा 'शासकीय इतमामातील' बंद : आशिष शेलार

मुंबई : लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि जनतेचा विरोध होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून महाराष्ट्र बंद जनतेवर लादला आहे. त्यामुळे हा 'शासकीय इतमामातील' बंद असून ठाकरे सरकारला जनताही अशाचप्रकारे 'शासकीय इतमामात' निरोप देईल, अशी टीका भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.


आशिष शेलार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला बंद आणि स्थगिती हे दोन शब्द खूप प्रिय आहेत. आणि याचा अनुभव महाराष्ट्राची जनता गेले पावणे दोन वर्ष घेत आहे. कोरोनाग्रस्त परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात येऊन शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांचे जीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे आणि यातच जनतेवर बंद लादण्यात आला.



हे सुद्धा वाचा - ‘आज वसूली चालू आहे की बंद?’


जनतेचा महाराष्ट्र बंदला विरोध होता, परंतु शासकीय अधिकारी जनतेच्या मनात भिती निर्माण करत होते, तर बेस्टचे महाव्यवस्थापक बंद यशस्वी होण्याच्या कामाला लागले होते. जनतेच्या मनात भिती निर्माण करून महाराष्ट्र बंद लादण्यात आल्यामुळे हा बंद 'शासकीय इतमामातील' बंद असल्याचे आशिष शेलार म्हणाले.

Comments
Add Comment

Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनावर 'या' प्रसिद्ध युट्युबरने केले असे काही की थेट झाली जेल वारी

मुंबई : २८ जानेवारी २०२६ महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. बारामतीमध्ये एका विमानाचा अपघात झाला आणि संपूर्ण

Mumbai 'MB3' Data : मुख्यमंत्रीडेटा ट्रॅफिक'ची कोंडी फुटणार

'इक्विनिक्स'ची मुंबईत मोठी गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ हजार कोटींच्या 'एमबी३' डेटा सेंटरचे

Mumbai BJP President MLA Amit Satam : बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाणार – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

बीएमसी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविण्यासाठी ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित केला जाणार;

Middle East War : युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १७ टक्क्यांची घसरण

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी

Bmc News : मुंबईत ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा

महापालिकेत ठरावाच्या सूचनेद्वारे झाली मागणी मुंबई : शहरात झपाट्याने वाढणाऱ्या ई-कचऱ्याच्या समस्येवर तोडगा