महाराष्ट्र बंदला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही

मुंबई : लखीमपूर खेरी येथील हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला. मात्र ज्या दादरमध्ये शिवसेना भवन आहे, त्याच दादरच्या मंडईत शेतमाल विकला गेला. सकाळी १० पर्यंत मंडईतील सर्व व्यवहार झाले. त्यामुळे दादरमध्ये शेतकरी आणि व्यापारांनी महाराष्ट्र बंदला प्रतिसाद न दिल्याचे चित्र दिसले.


सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला बंदचे आवाहन केले. परंतु साेलापूरमध्ये पहाटे शेतकऱ्यांनी माल बाजारात आणला आणि विकला. तसेच वाहतूकही सुरळीत सुरू होती. औरंगाबादसह राज्यातील अनेक मंडईत शेतमालाची विक्री करण्यात आली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आणि जनतेने महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद दिला नाही.


साताऱ्यात खासदार छत्रपती उदयनराजे यांनी स्वत: दुचाकी चालवत पुकारलेला बंद धुडकारला. तसेच शिर्डीतील सर्व व्यवहारही सुरू आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला शेतकऱ्यांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या