महाराष्ट्र बंदला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही

मुंबई : लखीमपूर खेरी येथील हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला. मात्र ज्या दादरमध्ये शिवसेना भवन आहे, त्याच दादरच्या मंडईत शेतमाल विकला गेला. सकाळी १० पर्यंत मंडईतील सर्व व्यवहार झाले. त्यामुळे दादरमध्ये शेतकरी आणि व्यापारांनी महाराष्ट्र बंदला प्रतिसाद न दिल्याचे चित्र दिसले.


सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला बंदचे आवाहन केले. परंतु साेलापूरमध्ये पहाटे शेतकऱ्यांनी माल बाजारात आणला आणि विकला. तसेच वाहतूकही सुरळीत सुरू होती. औरंगाबादसह राज्यातील अनेक मंडईत शेतमालाची विक्री करण्यात आली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आणि जनतेने महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद दिला नाही.


साताऱ्यात खासदार छत्रपती उदयनराजे यांनी स्वत: दुचाकी चालवत पुकारलेला बंद धुडकारला. तसेच शिर्डीतील सर्व व्यवहारही सुरू आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला शेतकऱ्यांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व