मुंबई : लखीमपूर खेरी येथील हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला. मात्र ज्या दादरमध्ये शिवसेना भवन आहे, त्याच दादरच्या मंडईत शेतमाल विकला गेला. सकाळी १० पर्यंत मंडईतील सर्व व्यवहार झाले. त्यामुळे दादरमध्ये शेतकरी आणि व्यापारांनी महाराष्ट्र बंदला प्रतिसाद न दिल्याचे चित्र दिसले.
सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला बंदचे आवाहन केले. परंतु साेलापूरमध्ये पहाटे शेतकऱ्यांनी माल बाजारात आणला आणि विकला. तसेच वाहतूकही सुरळीत सुरू होती. औरंगाबादसह राज्यातील अनेक मंडईत शेतमालाची विक्री करण्यात आली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आणि जनतेने महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद दिला नाही.
साताऱ्यात खासदार छत्रपती उदयनराजे यांनी स्वत: दुचाकी चालवत पुकारलेला बंद धुडकारला. तसेच शिर्डीतील सर्व व्यवहारही सुरू आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला शेतकऱ्यांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…