मुंबई : सध्या अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेकांना पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच आता मुंबईकरांनाही पाणीबाणीच्या संकटाला समोर जावे लागणार आहे. मे महिन्यात मुंबईमधील कांदिवली आणि बोरिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं व बुधवारीच जास्तीचा पाणीसाठा करून ठेवण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.
मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शनपर्यंत नवीन जोडरस्त्यालगत असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतलं आहे. हे काम पुढील आठवड्यात गुरुवार, २मे ते शुक्रवार, ३मे रात्री १० या वेळेत करण्यात येणार असल्याने २४ तास पाणीपुरवठा बंद असणार आहे. पाणी बंद असलेल्या जलवाहिनीचे २४ तासांत अलगीकरण करण्यात येणार आहे. आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा असेल तर काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याचे पालिकेने सांगितले.
देशात तिसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत आता आरक्षणाचा…
मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ…
माझे कोकण: संतोष वायंगणकर महाराष्ट्रातील कोकणची भूमी म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न असं…
मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले आहे. लखनऊने पहिल्यांदा खेळताना १६५ धावांची सन्मानजनक…
सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या १५० वर्ष जुन्या इमारतीचे पावसाळ्यापूर्वी…
मुंबई: आजकालच्या युगात लठ्ठपणाने साऱ्यांनाच ग्रासले आहे. जो तो वाढत्या वजनाबाबत काळजीत दिसतो. खराब खाण्यापिण्याच्या…