मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचे एसटी बँकेतील संचालकपद रद्द करण्यात आले आहे. सहकार खात्याने ही कारवाई केली आहे. सदावर्ते दाम्पत्य यापुढे बँकेत तज्ज्ञ संचालक म्हणून राहणार नाहीत. याशिवाय, संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशिर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की सदावर्ते (दाम्पत्यावर ओढावली आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.
वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना १४ दिवस आधी या सभेची सुचना देणे आवश्यक होते. परंतु अशा कुठल्याही सूचना या संचालक मंडळाकडून देण्यात आल्या नव्हत्या. आपल्या मर्जीतील सभासद बोलवून, हव्या त्या विषयांना मंजुरी मिळवून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. मुख्य म्हणजे पोटनियम बदलाची सुचना सभासदांना देणे बंधनकारक होते. या अनुषंगाने बँकेचे तज्ज्ञ संचालक म्हणून सदावर्ते पती-पत्नींची निवड बेकायदेशीर रित्या करण्याचा ठराव आणलेला ठराव सहकार खात्याने रद्द केल्याने आता यापुढे सदावर्ते पती-पत्नी स्वीकृत संचालक म्हणून राहणार नाहीत.
अॅड. गुणरत्न सदावर्ते कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहिलेले नाहीत. ते आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत राहिलेले आहे. त्यांच्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, सदावर्ते दाम्पत्याविरोधात एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे ऑक्टोबर २०२३ मध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार सहकार आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करत संचालक पद रद्द करण्याचा निर्णय दिला.
संदीप शिंदे यांनी सांगितले की, सदावर्ते यांची सत्ता एसटी बँकेत आली, तेव्हापासून त्यांचा कारभार चांगला राहिलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…