Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीभाजपला रोखण्यासाठी एकजूट महत्त्वाची : सोनिया गांधी

भाजपला रोखण्यासाठी एकजूट महत्त्वाची : सोनिया गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘आपल्याला लोकशाही, राज्यघटना आणि यासोबत काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीचे रक्षण करायचे आहे. तसेच, सध्या भाजपकडून होणारा खोटा प्रचार ओळखण्यासाठी आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे’, असे मत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेसच्या मुख्यालयात मंगळवारी पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांसह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये त्या बोलत होत्या.

‘भाजपच्या वैचारिक मोहिमेशी आपणही वैचारिक मुकाबला केला पाहिजे. आपल्याला ही लढाई जिंकायची असेल, तर यासाठी आपण दृढ निश्चयाने लोकांसमोर केले पाहिजे. भाजप, आरएसएसकडून होणारा खोटा प्रचार आपण उघड केला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला सारून काम केले पाहिजे’, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, ‘मी शिस्त आणि एकतेला सर्वोच्च प्राधान्य देऊ इच्छीते.

काँग्रेसमधील आपल्यापैकी प्रत्येकासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघटना मजबूत करणे. सर्वांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला सारून काम केले पाहिजे’, अशी अपेक्षाही सोनिया गांधींनी यावेळी व्यक्त केली आहे. दरम्यान राहूल गांधी यांनी पक्षाचे अध्यपद स्वीकारण्याबाबत आश्वासन दिले आहे असे समजते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -