पुणे (हिं.स.) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून आषाढी पायी वारी सोहळा काही मोजक्या वारकऱ्यांसमवेत लालपरीतून प्रवास करून पंढरीत साजरा करण्यात आला होता. मात्र सद्यस्थितीत राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने नियम, अटी व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे दोन वर्षांनंतर यंदा आषाढी पायी वारी सोहळा होणार आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वारकरी वारीच्या तयारीला लागले आहे.
यंदा आषाढी वारी सोहळा हा वारकऱ्यांच्या विक्रमी उपस्थितीत साजरा होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पालखी सोहळ्यासोबत चालणाऱ्या भाविकांच्या संख्येत तब्बल ४० टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे यांनी वर्तविला आहे.
या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील मुक्काम, विश्रांती, भोजन, रिंगण सोहळे, नदी आणि इतर परंपरागत ठिकाणांची पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि इतर मानकऱ्यांनी पाहणी केली.
मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला ९ विकेटनी हरवले. या सामन्यात विराट कोहलीने ७० धावांची…
लवकरच होणार घोषणा ठाणे : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) दोन टप्प्याचे मतदान पार…
धुळे : काका आणि पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात घडल्याची…
मुंबई : उन्हाळ्याच्या वाढत्या कडाक्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यातील प्रचंड उकाडा आणि लागणाऱ्या तीव्र…
जाणून घ्या नक्की प्रकरण काय? जयपूर : लग्न म्हटलं की नवरी, नवरदेव, वऱ्हाडी मंडळी आलीच.…
चक्क ४१ लाखांची लागली लॉटरी वॉशिंग्टन डी.सी : जगभरात कोणाचं नशीब कधी व कसं बदलेल…