मातृहृदयी सौ. निलमताई

Share

हर्षदा वाळके

असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, खंबीरपणे प्रत्येक सुखदुःखात साथ देणारी. जिच्या नुसत्या सोबत असण्याने देखील पुरुष यशाची उत्तुंग शिखरे चढत जातो. काही स्त्रिया नुसत्या सोबत चालत नाहीत, तर त्याच्या प्रत्येक कामात हिरिरीने खांद्याला खांदा लावून सक्रियपणे काम करतात व खऱ्या अर्थाने सहचारिणीचे कर्तव्य निभावतात. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या मार्गदर्शक सन्मा. सौ. निलमताई नारायणराव राणे. सर्वांच्या लाडक्या वहिनीसाहेब.

उत्कृष्ट पत्नी, संस्कारक्षम माता, कुशल व्यवस्थापक व संवेदनशील समाजसेविका अशी त्यांची ख्याती आहे. खरं तर सन्मा. राणेसाहेबांनी राजकारणात अनेक पदे भूषविली. नगरसेवक पदापासून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख सतत उंचावत राहिला. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री ते आज केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री पदापर्यंतचा उत्तुंग प्रवास थक्क करणारा आहे. या सर्व प्रवासात ताई नेहमीच सावलीसारख्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या दिसतात.

घर आणि समाजकारण यांचा उत्तम मेळ साधत त्यांनी कर्तव्यनिष्ठेने सहचारिणीची भूमिका उत्कृष्टपणे निभावली आहे. निलमताईंनी निलेशसाहेब व नितेशसाहेब यांच्या रूपाने संस्कारी संवेदनशील नेते जिल्ह्याला दिले.

त्यांच्यासारखे कुशल नेतृत्व त्यांनी घडवले. त्यांचे दोन्ही सुपुत्र आज वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण व समाजकारणात यशस्वीपणे घोडदौड करताना दिसतात, त्याचे पूर्ण श्रेय ताईंना जाते. राजकारण्यांच्या स्त्रिया सहसा सामाजिक जीवनात फारशा सक्रिय असलेल्या दिसत नाहीत. पण आमच्या निलमताई वेगळंच रसायन आहेत. ताईंनी आई, पत्नी, ही भूमिका साकारत असतानाच कुशल व्यवस्थापकाची जबाबदारीही लीलया पेलली. ताई मुळातच संवेदनशील स्वभावाच्या. त्यामुळे समाजातील लोकांसाठी विशेषतः महिलांसाठी काही तरी करावं या उद्देशाने त्यांनी सिंधुदुर्ग महिला भवन उभारले आणि अनेक महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली.

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा म्हणूनही त्या यशस्वीपणे काम पाहत आहेत. इंजिनीअरिंग काॅलेज व मेडिकल कॉलेजचं व्यवस्थापनही त्या पाहतात. या क्षेत्रात त्यांची निर्णय क्षमता वाखाणण्याजोगी आहे. अनेक हाॅटेल्सचे व्यवस्थापनाची जबाबदारी ही त्या ताकदीने पेलताना दिसतात.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ताईंनी अंगणवाडी सेविकांची संघटना बांधणी सुरू केली आहे. त्यातही त्या जातीने लक्ष देतात. निवडणुकीच्या प्रचारात त्या सक्रियपणे सहभागी होताना दिसतात. महिलांचे वेळोवेळी मेळावे घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेताना, मार्गदर्शन करताना दिसतात.

महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गळ्यातील त्या ताईत आहेत. सर्वांसाठी आदर्श आहेत. “काय गं कशी आहेस? बरी आहेस ना?” या सुहास्यवदनाने त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाने कार्यकर्त्या सुखावतात. त्या नेहमीच सर्वांच्या आधारस्तंभ आहेत.

या आदर्श नेतृत्वाला माझा मानाचा मुजरा!!

Recent Posts

Mumbai Rains:घाटकोपर दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू, मृतांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

मुंबई: मुंबईत सोमवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत आलेल्या धुळीच्या वादळाने तसेच अवकाळी पावसाने…

2 hours ago

IPL 2024: राजस्थानला मोठा झटका, जोस बटलर नाही खेळणार पुढील सामने

मुंबई: राजस्थान रॉयल्सचा(rajasthan  सलामीचा फलंदाज जोस बटलरने संघाला मोठा झटका दिला आहे. आता बातमी येत…

2 hours ago

Mumbai Rain : अवघ्या क्षणाचा पाऊस अन् जीव जाण्याची चाहूल

जाणून घ्या कुठं-कुठं काय घडले? मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातले…

2 hours ago

Jioने आणला नवा प्लान, मिळणार डेटा, कॉलिंग आणि १५हून अधिक OTT

मुंबई: जिओने एक नवा प्लान सादर केला आहे. हा Ultimate streaming plans आहे. हा पोस्टपेड…

3 hours ago

Loksabha Election : पैसे द्या,मग मत देतो ; आंध्र प्रदेशात मतदारांची अजब मागणी

नवी दिल्ली : सध्या देशभरात चौथ्या टप्प्याचे मतदान उत्साह पाहायला मिळाले. परंतु, आंध्र प्रदेशमधील पलानाडूच्या…

3 hours ago

Health Tips : मुंबईकरांनो सावधान! अवकाळी पावसामुळे वाढला संसर्गाचा धोका

'अशी' घ्या आरोग्याची काळजी मुंबई : मे महिन्यातील उन्हाळ्याचे दिवस चालू असताना मुंबईत अचानक अवकाळी…

3 hours ago