कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

Share

नाशिक: राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आणि नियमाप्रमाणे आपला कार्यकाळ पूर्ण केलेल्या तसेच जिल्ह्यातील स्थानिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिल्यामुळे निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी केली असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने तसेच पोलीस विभागाने याबाबतची यादी तयार केली असल्याचे प्रशासकीय सुधारणाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये आता नवीन प्रशासकीय अधिकारी येणार आहे.

पाच वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्ह्यात कार्यरत असलेले व स्वजिल्ह्यात तीन वर्षे सेवा बजावल्यामुळे पोलीस, महसूल, राज्य उत्पादन शुल्क, महापालिका, नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली असून, संभाव्य बदल्या टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची लॉबिंग सुरू झाली आहे. तर आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व गदपत्रे, नगरपालिकांच्या निवडणुक होऊ घातल्या आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्षपातीपणे पार तयारी पडाव्यात तसेच प्रशासकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी एकाच ठिकाणी काही वर्ष कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निवडणूक आयोगाचे धोरण आहे.

त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठवून या बदल्या करण्याबाबत सुचित केले आहे. लवकरच राज्यातील १५ महापालिका, २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्या तसेच २१३ नगर परिषदा व दोन हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली मुक्त वातावरणात पार पडाव्यात असा आयोगाचा त्यामागचा हेतू आहे. एकाच ठिकाणी काही वर्ष कार्यरत असलेले शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थानिक पातळीवर राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध निर्माण होतात व त्यातून प्रत्यक्ष निवडणूक काळात हे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून परीचिताना झुकते माप देतात त्यामुळे निवडणूक मुक्त वातावरणात पार पडणे शक्य नसल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.

त्यामुळे पाच वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्ह्यात वास्तव्यास असलेले व स्वजिल्हा म्हणजे त्याच जिल्ह्यातील रहिवासी असताना तीन वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर अथवा निवडणुकीशी संबंध येणार नाही, अशा ठिकाणी बदल्या आयोगाकडून करण्याची शिफारस करण्यात आली.

Recent Posts

Heatwave in India : देशभरात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचणार! तर काही भागात मुसळधार!

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…

2 hours ago

उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…

2 hours ago

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

5 hours ago

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…

6 hours ago

Mihir kotecha : लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचाय की तुमचा सेवक पाठवायचाय?

कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…

7 hours ago

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

8 hours ago