चांदवड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत होत नाही म्हणून भाजपच्या वतीने सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर आमदार राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन केले. यावर अधिकाऱ्यांनी लवकरच वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा, त्याचप्रमाणे थकीत वीज बिलासाठी खंडित केलेला ग्रामीण भागातील वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपच्या वतीने आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-आग्रा महमार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्यांबाबत भाजप आक्रमक झाले असून याबाबत आवाज उठवण्यासाठी ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.
जिल्ह्यातील ग्रामीण तालुक्यातील शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध असून सध्या रब्बी पिकांची पेरणी करून गहू, मका, हरभरा, भुईमूग इत्यादी पिकांना सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असते, मात्र विद्युत विभागाकडून शेतकऱ्यांना कधी दिवसा, तर कधी रात्री वीज पुरवठा केला जातो. तर काही ठिकाणी थकीत वीजबिलामुळे वीज पुरवठाच खंडित केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण भाजपने सोमवारी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला. दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र कालांतराने सुरळीत झाली. यावेळी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्न लवकरच सोडविला जाईल, असे आश्वासन दिले.
CSK vs RCB: आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आमने-सामने…
मायभाषा: डॉ. वीणा सानेकर महाराष्ट्र ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार…
स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी, २० मे रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या…
मुंबई: विराट कोहलीने चेन्नई सुपरकिंग्सविरोधात आयपीएल सामन्यात रेकॉर्ड्सची बरसात केली आहे. विराट कोहलीचे अर्धशतक तीन…
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पाचव्या टप्प्याचे मतदान २० तारखेला होणार आहे. यातच…
काशी व मथुरेमध्ये मंदिर बांधण्यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा…