बार्बाडोस (वृत्तसंस्था): एकदिवसीय मालिकेसाठी बार्बाडोसला जात असलेल्या भारतीय संघाचे प्रवासादरम्यान चांगलेच हाल झाले. त्यांना त्रिनिदाद विमानतळावर जवळपास ६ तास विमानाची वाट पाहत बसावे लागले.
भारतीय संघाची बार्बाडोससाठी रात्री ११ वाजताची फ्लाईट होती. मात्र या ११ वाजताच्या विमानाने रात्री ३ वाजता उड्डान घेतल्याचे समजते. यानंतर भारतीय संघ पहाटे ५ वाजता बार्बाडोस येथे दाखल झाला. यामुळे खेळाडू खूप नाराज झाले होते. यावेळी त्यांनी बीसीसीआयकडे इथून पुढे विमान प्रवास सकाळी करण्याची विनंती केली.