एसटीचा संप कागदावरच मिटला, पालघर जिल्ह्यातील एसटीचे चाक रुतलेलेच

Share

पालघर (वार्ताहर) :एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू असलेला एसटीचा संप मिटला, अशी घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबईत केली आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात ४०१ एसटी बस अद्याप आगारातच उभ्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरात लवकर मिटावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.

परिवहन मंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची बैठक होऊन संघटनेचे नेते अजय गुजर प्रणित कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कामगार संघटनेने या संपातून माघार घेतली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असले तरी काही कामगार संघटना अद्याप नाराज असल्याचे समोर आले आहे.

एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचारी ठाम असल्याने अखेरीस हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. २२ डिसेंबर ला याबाबत मुंबई उच्च न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणवंत सदावर्ते यांनी सांगितले की हा संप नसुन दुखवटा आहे आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब झाली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने याबाबत पुढील तारीख ५ जानेवारी दिली असून कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. कर्मचारी मात्र मागणीवर ठाम आहेत.

९१ जणांची सेवा समाप्त करणार

पालघर जिल्ह्यातील आठ आगारातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. सरकारने पगारवाढ दिल्यानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले. अनेक कर्मचारी अद्याप कामावर हजर झालेले नाहीत. अशा ९१ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली जाण्याची शक्यता आहे.

४५ दिवसांत २२ कोटी ९९ लाख रुपयांचे नुकसान

पालघर जिल्ह्यात एसटीच्या संपामुळे सर्वसामान्याची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. यामुळे पालघर एसटी विभागाचे तब्बल २२ कोटी ९९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

कर्मचाऱ्यांना हवे विलीनीकरण

सरकारने दिलेल्या पगारवाढीनंतर सध्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना विलीनीकरणच हवे आहे. अद्याप बहुसंख्य कामगार विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी सरकारने दिलेली पगारवाढ नाकारली आहे.

Recent Posts

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी अमेरिकेच्या संघाची घोषणा, भारतीय खेळाडूंचा भरणा

मुंबई:आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४ची(icc mens cricket world cup 2024) क्रिकेट चाहते अतिशय आतुरतेने वाट…

19 mins ago

Loksabha Election 2024: मतदानाआधी दिल्ली काँग्रेसला झटका, माजी प्रदेश अध्यक्ष अरविंदर सिंह लवली भाजपमध्ये

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष…

1 hour ago

Godrej: भावंडांच्या मतभेदातून गोदरेज कंपनीच्या वाटण्या…

Godrej Family Split: गोदरेज कुटुंबाने 30 एप्रिल रोजी 127 वर्ष जुन्या कंपनीला दोन संस्थांमध्ये विभाजित…

2 hours ago

Saving Plan: दररोज वाचवा केवळ २५० रूपये आणि मिळवा २४ लाख रूपये

मुंबई: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही रक्कम वाचवत असतो. तसेच ही रक्कम अशा जागी…

2 hours ago

‘या’ तारखांना लागणार दहावी-बारावीचे निकाल…

CBSC: काही दिवसांपासुन दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत बनावट परिपत्रके समाजमाध्यमामध्ये व्हायरल होत आहेत. हा प्रकार…

3 hours ago

गुंतवणुकदारांसाठी खुशखबर, NSE देणार एका शेअरवर चार बोनस शेअर!

NSE: नॅशनल स्टॉक एक्सचेंज पात्र गुंतवणुकदारांच्या एका शेअरवर चार बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.…

4 hours ago