मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा उत्तर-मध्य मुंबईच्या जागेवरुन मविआकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत फूट पडली आहे. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर दुसर्याच दिवशी काँग्रेसचे माजी मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते नसीम खान (Naseem Khan) यांनी आपली नाराजी स्पष्टपणे माध्यमांसमोर मांडली. त्यांच्या समर्थनार्थ आता काँग्रेसचे काही नेते एकत्र आले आहेत. वर्षा गायकवाड उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, त्याआधीच आज काँग्रेस नेत्यांनी गायकवाड यांच्या उमेदवारी विरोधात बैठक भरवली आहे.
वर्षा गायकवाड यांचे नाव जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नसीम खान यांनी पक्षाच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकही उमेदवार अल्पसंख्याक समाजातून उभा न केल्याचा निषेध केला. नसीम खान यांची नाराजी ताजी असतानाच आज मुंबई काँग्रेस नेते वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीविरोधात एकवटले आहेत. नसीम खान यांच्यासह भाई जगताप, सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे आणि इतर पदाधिकारी एकत्र आले आहेत. वर्षा गायकवाड मतदारसंघात बाहेरच्या उमेदवार असल्याचा आरोप होत आहे.
दुसरीकडे, नसीम खान यांनी राजीनामा देताना “दोन महिन्यांपूर्वी मला पक्षाची उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे मुंबईतील अल्पसंख्याक समाजात उत्साह संचारला होता. तथापि, पक्षाने या जागेवरून वेगळे नाव जाहीर केले आहे, ज्यामुळे अल्पसंख्याक समाजात अशांतता निर्माण झाली आहे,” अशी प्रतिक्रिया दिली होती.
“मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये पक्षाच्या आदेशांचे पालन करत आहे. मी प्रामाणिकपणे आदेश पूर्ण केले. पण एकाही अल्पसंख्याक सदस्याला उमेदवारी का दिली नाही? असा प्रश्न अल्पसंख्याक समाजाने विचारला तर मी आता अवाक् होईन. त्यामुळे मी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई: उन्हाळ्यात प्रमाणापेक्षा आल्याचा वापर शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगणार आहोत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर जोरदार टिका यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा मुंबई…
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…
आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…
ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…
बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…