मुंबई : मराठी सिनेसृष्टीत (Marathi cinema) दर्जेदार सिनेमांचा तुटवडा जाणवत असताना एक असा सिनेमा आला की ज्याने मराठी सिनेमांचं समीकरणच बदलून टाकलं. मराठी सिनेमाला सातासमुद्रापार नेणाऱ्या या सिनेमाने मराठीत आजवरची सर्वाधिक १०० कोटींची कमाई केली. तो म्हणजे नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘सैराट’ सिनेमा (Sairat Movie). या सिनेमाने नावाप्रमाणेच प्रेक्षकांना सैराट करुन सोडलं. आजही कोणत्याही कार्यक्रमात ‘झिंगाट’ (Zingaat) गाण्यावर नाचल्याशिवाय लोकांचं मन भरत नाही, ही या सिनेमाची आणि अजय-अतुलच्या (Ajay-Atul) संगीताची जादू आहे.
‘सैराट’ सिनेमाला आज आठ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने या चित्रपटाची नायिका रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) म्हणजेच सगळ्यांची लाडकी आर्ची हिने आर्ची-परशाचे (Archi-Parshya) काही अनसीन फोटोज शेअर केले आहेत. पडद्यामागील रिंकू-आकाशची धमाल, घोडेस्वारी करतानाचा फोटो आणि तिचं पहिलं फोटोशूट या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “सैराटला आज ८ वर्ष पूर्ण झाली…” असं कॅप्शन रिंकूने या फोटोंना दिलं आहे. हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांनी रिंकूच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत सैराटचे तिचे गाजलेले संवाद पोस्ट केले आहेत. तर एकाने,”मराठी चित्रपट जगताला वरच्या टोकावर नेण्याचा आणि मराठीची ताकद जगाला दाखवण्याचा नागराज मंजुळेचा सर्वोत्तम प्रयत्न होता. अजय-अतुल यांनी आपल्या ज्ञानाने मराठी संगीत जगभर गाजवले. उमदा अभिनय परश्या आर्ची” असं म्हणत या सिनेमाचं कौतुक केलं तर एकाने सैराटचा दुसरा पार्ट काढण्याची मागणी केली आहे.
‘सैराट’ सिनेमा २९ एप्रिल २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा पाहण्यासाठी लोक एक-दोनदा नव्हे तर तब्बल १७ वेळा सिनेमागृहात गेल्याचीही उदाहरणे आहेत. प्रेम, मैत्री आणि मजामस्ती दाखवत असतानाच एका महत्त्वाच्या सामाजिक विषयावर या चित्रपटाने भाष्य केलं होतं. समाजातील सत्य परिस्थिती दाखवण्यात नागराज मंजुळे यशस्वी झाला आणि म्हणूनच हा चित्रपट लोकांनाही प्रचंड आवडला. रिंकूने शेअर केलेल्या फोटोजच्या निमित्ताने आठ वर्षांपूर्वीचा रिंकूचा लूक आणि तिच्यात इतक्या वर्षांमध्ये झालेले बदल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ती आठवीत शिकत असताना तिने या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. तेव्हाचे रिंकू-आकाश आणि सिनेमाला यश मिळाल्यानंतर त्यांच्यात घडलेला बदल खरंच लक्ष वेधून घेणारा आहे.
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध चतुर्दशी सायंकाळी ०६.४७ नंतर पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती…
मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक…
फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…
इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…
मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सची अय्यर जोडीने कमाल केली. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला हरवत दिमाखात आयपीएलच्या…
मुंबई: झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे रील बनवण्याच्या नादात तरुणाने १००…