सोळाशे घटांचा वापर सुशोभीकरणासाठी

Share

अनिकेत देशमुख

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेने मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सव झाल्यानंतर विसर्जन करण्यात आलेल्या सोळाशे घटांचा झाडे लावण्याकरता व सुशोभीकरणासाठी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

१५ ऑक्टोबर रोजी नवरात्री उत्सवात दुर्गा पूजन मूर्तीचे तसेच घटांचे विसर्जन शहरात ठिकठिकाणी भाविकांकडून करण्यात आले होते. महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेशानुसार उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनात स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ सर्वेक्षण संकल्पने नुसार अंदाजे १६०० घटांचे संकलन करून त्या घटांचा सुशोभीकरणासाठी तसेच झाडे लावण्यासाठी वापर करण्यात येणार असल्याचे उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले.

मीरा-भाईंदर शहरात कोरोनाच्या पार्शवभूमीवर यंदाचा नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. मूर्ती व घटाच्या विसर्जनासाठी पालिकेमार्फत शहरात स्वीकृती केंद्र उभारण्यात आली होती. नागरिकांमार्फत दसऱ्या दिवशी घरात बसवलेले घट स्वीकृत केंद्रावर विसर्जना करता देण्यात आले. शिवारगार्डनच्या तलावात दुर्गामातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले असून त्यातील घट स्वच्छ पुनर्वापरासाठी पालिकेच्या स्वछता निरीक्षक अनिल राठोड यांच्या देखरेखीखाली वेगवेगळे करण्यात आले आहेत.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त मुठे यांनी पालिकेच्या गार्डन विभागाला १६०० मडक्यांमध्ये झाडे लावण्याचे आदेश दिले असल्याचे स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड यांनी सांगितले आहे. यामुळे यावर्षी पालिका अतिशय चांगल्या प्रकारे घट व मडकी यांचा वापर करून पुन्हा त्यांना कामात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ४ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…

52 mins ago

पाकिस्तानला काँग्रेसचा पुळका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…

4 hours ago

नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…

4 hours ago

मतदान जनजागृती काळाची गरज

रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…

5 hours ago

MI vs KKR: १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताचा विजय

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…

6 hours ago

Narendra Modi : बंगालचे नाव तृणमुलमुळे खराब झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…

7 hours ago