नवी मुंबई (प्रतिनिधी) : मनपाचे झीरो कचरा कुंडी अभियान संपण्याच्या मार्गावर असून, तुर्भे येथील मनपा विद्या मंदिरासमोरच कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसहित शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळेसमोर कचरा टाकण्यावर प्रतिबंध आणावा, अशी मागणी सेना शाखाप्रमुख सिद्धाराम शिलवंत यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.
स्वच्छता अभियानांतर्गत मनपाकडून यावर्षी झीरो कचरा कुंडी अभियान राबविले होते. कचरा घंटा गाडीद्वारे क्षेपणभूमीमध्ये टाकला जात होता; परंतु घंटा गाडी वेळेवर येत नसल्याने शाळेसमोर कचरा टाकला जात आहे. यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे.
या ठिकाणी कचरा वाहतूक करणारी वाहने नियोजित वेळेत सुरू करण्यात येतील. तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. – सुधाकर वडजे, स्वच्छता अधिकारी, तुर्भे
नवी दिल्ली: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आता…
मुंबई: घरात अनेकदा माहीत नसताना काही चुका अशा ज्या समस्या निर्माण करतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) साठी आता चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही.…
लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : सध्या अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. अशाच…
संजय राऊत हा महाराष्ट्राचा बिलावल भुट्टो पाकिस्तानचे समर्थन करणार्या काँग्रेसला आमदार नितेश राणे यांचा दणका…
देवेंद्र फडणवीसांचा अमोल कोल्हेंना इशारा शिरुर : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार…