नवी मुंबई निवडणुकीतून प्रकट होणार दोस्ती यारी!

Share

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई मनपा निवडणुकीत दोस्ती यारी प्रकट होणार असल्याचे एकंदरीत निवडणूक प्रक्रियेतून समोर आले आहे.
महानगरपालिकेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने बहुस्तरीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. यामुळे नवी मुंबईत तीन प्रभागांचे एकत्रीकरण करून तीन उमेदवारांचा समूह करून मतदार राजाकडे मतांचा जोगवा मागावा लागणार आहे. हे तीनही उमेदवार एकमेकांना साथ देऊन विजयी होण्यासाठी वाटचाल करणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ५ ऑक्टोबर रोजी एक अध्यादेश काढला. त्यामध्ये राज्यात होणाऱ्या विविध नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. यामध्ये तीन सदस्य प्रभाग पद्धती करण्यास अडचणी येत असतील, तर २ किंवा ४ प्रभाग पद्धती अवलंबण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत; परंतु नवी मुंबई मनपात १११ प्रभाग आहेत. त्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रभागात तीन सदस्यीय प्रभाग रचनेत एकूण ३७ प्रभाग निर्माण होणार आहेत. निवडणूक आयोगाने काढलेल्या अध्यादेशानुसार व नियमानुसार मनपाची लोकसंख्या व प्रभाग हे तीन सदस्यीय रचनेस योग्य असल्याने नवी मुंबईत तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेतली जाणार आहे.

नवी मुंबईत असलेली महाविकास आघाडी, भाजपमध्ये काटे की टक्कर लढत होणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत एक सदस्यीय पद्धत असल्याने अनेक माजी नगरसेवकांची ताकद आपल्या एकाच प्रभागात सीमित राहिली आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जे तीन प्रभाग मिळून एक प्रभाग होणार आहे. त्यातील एका पक्षातील तिन्ही उमेदवारांना एकत्रित येऊन प्रचार करावा लागेल. हेवेदावे विसरावे लागतील. पण, जुना राग उकरून काढल्यास अपयशाचे मानकरी व्हावे लागेल. त्यामुळे निवडणुकीत तरी दोस्तीगिरीला चालना मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

कुरघोडी ठरणार अपयशाला कारणीभूत….

आजही राजकीय पक्षात हेवेदावे आहेत. जर उमेदवारांनी आपला वाद निवडणुकीच्या रिंगणात काढला, तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्यास कारणीभूत ठरणार आहे. म्हणून एकाच प्रभागात लढताना मैत्रीपूर्ण वाटचाल करावी लागणार आहे.

Recent Posts

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

45 mins ago

३६५ दिवस चालणार Jioचा हा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मिळणार FanCode

मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…

2 hours ago

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…

3 hours ago

चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…

4 hours ago

मुंबईकरांच्या विकासाला कौल देणारी निवडणूक

सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी…

8 hours ago

होर्डिंग काळ बनून येतो तेव्हा…

विवेक वेलणकर: सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्धीचे एक माध्यम म्हणून अवाढव्य होर्डिंग उभे करण्याचा पायंडा पडला आणि…

9 hours ago