Shraddha Murder : ‘त्या’ तक्रारीकडे दुर्लक्ष करणा-या मुंबई पोलिसांची होणार चौकशी?

Share

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या (Shraddha Murder) प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणासंदर्भात भाष्य करताना मुंबई पोलिसांच्या तपासाचे संकेत दिले आहेत. दिल्ली आणि मुंबई पोलिसांमध्ये कोणताही असमन्वय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आफताब आपली हत्या करून शरीराचे तुकडे करील, अशी तक्रार श्रद्धाने आधी केली होती. मात्र, महाराष्ट्रात त्यावर काही कारवाई का झाली नाही, याची चौकशी केली जाईल. त्या वेळी तेथे आमचे सरकार नव्हते. मात्र, याला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल,’ असे ते म्हणाले.

दिल्लीत घडलेल्या या हत्याकांडामध्ये आफताब पूनावालाने त्याची लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धाचा १८ मे रोजी गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज एका तुकड्याची विल्हेवाट लावत त्याने हे तुकडे जंगलामध्ये फेकून दिले होते. या प्रकरणात रोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्याला कमीत कमी वेळेत कठोर शिक्षा व्हावी, यासाठी दिल्ली पोलीस आणि सरकारी वकील पूर्ण प्रयत्न करतील, अशी ग्वाही गृहमंत्री शहा यांनी गुरुवारी दिली. इतकच नाही तर ज्या २०२० च्या मारहाण प्रकरणामध्ये श्रद्धाने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती त्याचाही संदर्भ देत आमित शाह यांनी थेट मुंबई पोलिसांचीच चौकशी केली जाणार असल्याचे विधान केले.

आफताब पूनावालाविरोधात श्रद्धाने २०२० मध्ये महाराष्ट्र पोलिसांना दिलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई का झाली नाही, याचीही चौकशी करण्यात येईल असे ते म्हणाले. “या प्रकरणावर माझे लक्ष आहे. हे कृत्य ज्याने केले आहे, त्याला कायदेशीर मार्गाने कठोर शिक्षा व्हावी, यासाठी दिल्ली पोलीस आणि सरकारी वकील पूर्ण प्रयत्न करतील,’ असे अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले.

संबंधित बातम्या…

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबला लागले १० तास

‘लव्ह जिहाद’ने केली श्रद्धाची कत्तल

Recent Posts

KKR vs MI: सुनील नरेनची ऐतिहासिक कामगिरी, शून्यावर बाद झाल्यानंतर केला रेकॉर्ड

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला शनिवारच्या सामन्यात हरवले. केकेआरने हा सामना १८ धावांनी जिंकला. हा…

55 mins ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १२ ते १८ मे २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, १२ ते १८ मे २०२४ अनुकूल काळ मेष : शिक्षण, नोकरी-व्यवसायात अनुकूल काळ…

4 hours ago

वृद्धाश्रम ही आजच्या काळाची गरज…

विभक्त कुटुंब पद्धती आणि बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे. ज्येष्ठांनीही ती…

4 hours ago

मंगळसूत्र

मंगळसूत्र हे सौभाग्याचे लेणे आणि लग्नाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच लग्नानंतर स्त्रिया मंगळसूत्र घालतात. मंगळसुत्रातले…

4 hours ago

मुंबईतील प्राचीन धार्मिक स्थळ : महालक्ष्मी मंदिर

मुंबईतील धार्मिक स्थळांपैकी एक महालक्ष्मी मंदिर आहे. मुंबईतील महालक्ष्मीचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे, तो सारा…

4 hours ago

अद्वैताशी सांगड

माधवीताई म्हणतात की, “आजकालच्या तरुण पिढीचे आयुष्य अतिशय धावपळीचे झाले आहे. त्यांनी आयुष्यात थोडे विसाव्याचे…

5 hours ago