नवी दिल्ली : नशामुक्ती केंद्रातून (De-addiction center) परतलेल्या तरुणाने संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याची घटना नवी दिल्लीत घडली. काही महिन्यांपासून नशामुक्ती केंद्रात असलेला २५ वर्षांचा केशव घरी परतला. काही कारणावरून त्याचा कुटुंबीयांशी वाद झाला. यानंतर केशवने आई, वडील, लहान बहिण आणि आजीची चाकूने भोसकून हत्या केली.
हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस रात्री साडे दहा वाजता घटनास्थळी पोहोचले. आरोपीने तिथून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पकडण्यात यश आले. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली. आईने प्रेमापोटी केशवला घरी परत आणले होते. मात्र त्याची अमली पदार्थांची सवय काही सुटली नव्हती. त्यामुळे कुटुंबिय केशवशी वाद घालायचे. हत्येवेळी केशव नशेच्या अमलाखाली होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दहा दिवसांनंतर समोर आली मोठी अपडेट नवी दिल्ली : 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (LS polls) पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून,…
नगर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने येथील दलित…
नगर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या…
मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) गुरूवारी ५०वा सामना खेळवण्यात आला. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स…
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली…