बारामती : जेजुरीतील भीषण अपघाताची (Accident) घटना ताजी असतानाच पुणे (Pune) जिल्ह्यात वारीदरम्यान आणखी एक दुर्दैवी अपघात घडला आहे. बारामतीजवळ मध्यरात्री भरधाव कारने एका वारकऱ्याला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच (Death) मृत्यू झाला. या घटनेनंतर वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मृत वारकऱ्याचे नाव विष्णू रामचंद्र पवार (वय 67) असे असून, ते विठुरायाच्या दर्शनासाठी दिंडीसोबत पंढरपूरकडे जात होते. रात्रीच्या वेळी भजन करत प्रवास सुरू असताना भरधाव वेगातील कारने त्यांना जोरदार धडक दिली.
Nashik : विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाच्या गुणवत्तेत गंभीर त्रुटी आढळून आल्याचं जिल्ह्यात आढळून आल्याने प्रशासन खडबडुन जागं झालं आहे. राज्य शासनाच्या ...
अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक नागरिक आणि इतर वारकऱ्यांनी गंभीर जखमी झालेल्या विष्णू पवार यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सुनील तटकरे; अर्थमंत्री पदाबाबत सुनेत्रा पवारांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार मुंबई : "आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज, विसंवाद अथवा अविश्वासाचा विषय नाही. ...
घटनेची माहिती मिळताच बारामती (Baramati) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार कारचालकाचा शोध सुरू आहे.
गेल्या काही दिवसांत वारीदरम्यान घडलेल्या सलग अपघातांमुळे वारकऱ्यांच्या (Warkari) सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.






