Ahilyanagar : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचनेनुसार राज्यात ‘ऑपरेशन शोध-खत’ ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी (Ahilyanagar District Police) उल्लेखनीय यश मिळवत एकूण 98 बेपत्ता बालकांचा शोध लावला आहे. शोधण्यात आलेल्या सर्व बालकांना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मंगळुरू : कर्नाटकच्या (Karnatak) मंगळुरू (Mangluru) शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि महिलांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना उघडकीस आली आहे. ...
15 दिवसांत 98 अल्पवयीन मुलांचा शोध
'ऑपरेशन शोध-खत’ ही विशेष मोहीम 8 ते 23 जून 2026 या कालावधीत अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हात राबवण्यात आली. हरवलेल्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. मोहिमेदरम्यान 90 मुली आणि 8 मुले, अशा एकूण 98 बेपत्ता बालकांचा (Missing children) शोध घेण्यात पोलिसांना यश आले. या सर्वांची आवश्यक कायदेशीर पडताळणी आणि प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या व नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे (Police Station) , उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतील विशेष पथके तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (Anti-Human Trafficking Unit) यांनी समन्वयाने या मोहिमेसाठी काम केले.
मुंबई : मिरा रोड पूर्व येथील एका निवासी इमारतीत मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमुळे मोठी दुर्घटना टळली. सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सला ...
भविष्यातही मोहीम राबवणार
नागरिकांनी त्यांच्या परिसरात कोणतेही बेपत्ता बालक आढळल्यास किंवा संशयास्पद माहिती मिळाल्यास ती तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यासोबतच अल्पवयीन मुलांचे अपहरण, बेपत्ता होण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि हरवलेल्या बालकांचा वेगाने शोध घेण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
रायपूर : रायपूर मधील छत्तीसगडच्या भिलाईत परिसरात बुधवारी(Wednesday) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शादाब शेख (१९ वय) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. ...
विशेष पथकांकडून शोध
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलिसांनी गोपनीय माहिती संकलन, तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर तसेच इतर जिल्ह्यांतील पोलिसांशी प्रभावी समन्वय साधला. प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्याने स्वतंत्र विशेष पथके तयार करून शोधमोहीम राबविली. त्यामुळे कमी कालावधीत मोठ्या संख्येने बेपत्ता बालकांचा शोध घेणे शक्य झाले.
दरम्यान, ही मोहीम पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Superintendent of Police Mummaka Sudarshan) , अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे (Vaibhav Kalubarme) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले (Ganesh Ugale) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे (Kiran Shinde) आणि त्यांच्या पथकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.






