उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती दिला भगवा; लोकसभा अध्यक्षांकडे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याची प्रतिक्रिया
मुंबई : 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत बंडखोरी केलेल्या उबाठा गटाच्या सहा खासदारांनी सोमवारी (दि. २२) शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हाती भगवा दिला. त्याचवेळी, "कायद्याच्या आणि संसदीय चौकटीत लोकसभा अध्यक्षांकडे आम्ही ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आम्ही कोणतेच ऑपरेशन अर्धवट करीत नाही, फुल प्रुफ करतो. आज सगळे तुमच्यासमोर आहे. 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाले आहे", अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर बंडखोर खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, रामदास कदम उपस्थित होते. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "आज व्यासपीठावर शिवसेनेचे सहा 'टायगर' उपस्थित आहेत. माध्यमांनी ज्याला 'ऑपरेशन टायगर' नाव दिले होते, ते आज शंभर टक्के यशस्वी झाले आहे. विशेष म्हणजे आमच्याकडे आता 'ट्रिपल संजय' आले आहेत. खासदार संजय जाधव, संजय दिना पाटील आणि संजय देशमुख. त्यामुळे आता बाकी संजयची (संजय राऊत) गिनती शून्य झाली आहे, त्याचे नाव घेण्याचीही मला गरज वाटत नाही. आज वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या मूळ विचारांवर निष्ठा ठेवणारे कट्टर शिवसैनिक खासदार खऱ्या शिवसेना परिवारात सामील झाले आहेत", असेही ते म्हणाले.
२१ ते २३ जुलैदरम्यान ५० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत उपक्रमांचा धडाका जमीन मोजणी ते शेतकरी ...
उबाठा गटाने केलेल्या तुडवा-तुडवीच्या भाषेला उत्तर देताना शिंदे म्हणाले, "आम्ही कोणाला उगाच अडवायला किंवा कोणाला तुडवायला आलेलो नाही, तर बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्रभर वाढवायला आलो आहोत. पण, जर कोणी आमच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केला किंवा आम्हाला आडवे आले, तर त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अस्सल हिसका काय असतो, हे दाखवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कुणीही मालक नाही, आम्ही सगळे एकमेकांचे सहकारी आहोत. एकनाथ शिंदे देखील तुमच्यासोबत मुख्य नेता म्हणून नाही, तर एक साधा कार्यकर्ता म्हणून वागेल. या सर्व ६ खासदारांचा आणि त्यांच्यासोबत आलेल्या हजारो कार्यकर्त्यांचा मानसन्मान पक्षात राखला जाईल. राज्यात आणि केंद्रात 'डबल इंजिन' सरकार आहे, त्यामुळे तुमच्या मतदारसंघातील विकासाचा एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही, हा विश्वास मी देतो," असा शब्द शिंदेंनी दिला.
जळगाव : जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाने मोठी ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात सरासरी ...
लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून दिली आहे. आगीने काही मिनिटांतच विक्राळ ...






