धाराशिव : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघात मोठा Political Drama पाहायला मिळाला. महाविकास आघाडीत बंडखोरी करत अर्ज दाखल केलेल्या उबाठा (UBT) गटाच्या पाच नगरसेवकांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीतच भाजपच्या (BJP) सोबत जाण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या डोळ्यांदेखत ही संपूर्ण घडामोड घडली.
महाविकास आघाडीच्या जागावाटपानंतर उबाठा गटातील पाच नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावले होते. या गटाचे नेतृत्व करणारे नगरसेवक राजाभाऊ (राजू) पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बंडखोर गट निवडणूक (Election) लढवण्यावर ठाम असल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने राजाभाऊ पवार यांची भेट घेतली. त्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर राजाभाऊ पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.
पुणे : कोथरूड येथे झालेल्या गोळीबार (firing) प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या घायवळ टोळीविरोधात (gang) पुणे पोलिसांनी मोठी कारवाई (action) केली आहे. टोळीचा ‘ब्रेन’ ...
निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. मात्र, त्याचवेळी राजाभाऊ पवार आणि त्यांच्यासोबतचे उबाठा गटाचे पाच नगरसेवक भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. ओमराजे यांच्या समोरच या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ऐनवेळी स्वतःच्या गटातील नगरसेवकांनी भाजपची साथ दिल्याने ओमराजे निंबाळकर यांना मोठा Political Shock बसल्याची चर्चा रंगली आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघात आता भाजपचे उमेदवार बसवराज पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्याने या निवडणुकीतील समीकरणे आणखी स्पष्ट झाली आहेत.






