मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशसेवेची आणि पंतप्रधान पदाच्या कार्यकाळातील यशस्वी १२ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचे सोमवारी (२५ मे) मुंबईत भव्य प्रकाशन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
बीड भूसंपादन घोटाळ्यातील जिल्हाधिकाऱ्याचे अखेर निलंबन
मुख्यमंत्र्यांचे निर्देश; वाढीव मोबदल्याआडून शासनाची ७३ कोटींची फसवणूक
मुंबई : बीड जिल्ह्यातील बहुचर्चित राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मावेजा ...
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील गेल्या १२ वर्षांतील देशाचा विकासप्रवास, महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय आणि विविध क्षेत्रांतील कामगिरीचा लेखाजोखा या विशेषांकाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. हा प्रकाशन सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला असून, यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Maharashtra HSC Marksheet Date : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! ‘या’ तारखेपासून मिळणार मूळ गुणपत्रिका
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. ऑनलाईन निकाल जाहीर ...