Wednesday, March 18, 2026

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला होता. त्याप्रमाणे अचानक ढग निर्माण

होऊन अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाच्या उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीसाठी तयार असलेली गहू, हरभरा, ज्वारी तसेच द्राक्ष पिकांना या पावसाचा फटका बसल

आहे. अनेक ठिकाणी शेतात कापणी करून ठेवलेले पीक भिजल्याने उत्पादनाची गुणवत्ता घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत वाढ होत असतानाच अचानक ढगाळ वातावरण तयार

होऊन पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली असून, साठवणूक न झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >