मुंबई : महाराष्ट्र सह इतर राज्यात वादळी वारे येण्याची शक्यता हवामान विभाग खात्याने दर्शवली आहे . वाढत्या तापमानाच्या बदळा मुले वातावण अगदी विसकळीत झाले आहे त्यात आता वादळी वाऱ्याची भर पडली आहे सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याचं ऊन पडत आहे. पण आता वातारणात मोठे बदल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. देशातील काही राज्यांमध्ये पुढच्या काही तासांत 110 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. यासोबत मुसळधार पावसाचादेखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. नैऋत्यू मान्सून वेगाने आगेकूच करत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/05/28/issf-world-cup-2026-isha-singh-breaks-world-record-with-gold-medal-special-praise-from-chief-minister-fadnavis/
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांना देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडसह जम्मू आणि काश्मीरमध्ये वादळ येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मध्य प्रदेळातही वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात 30 मे पर्यंत मुसळधार पावसाचा आणि गारपीटचा अंदाज वर्तवण्यात आल आहे. छत्तीगड राज्यात 29 आणि 30 मे या दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या तरी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे