विदर्भात उष्णतेने अक्षरशः कहर माजवला असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस नवे विक्रम मोडताना दिसत आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे हाल होत असतानाच आता वन्यजीवांनाही त्याचा मोठा फटका बसू लागला आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील सिरोंचा परिसरात तब्बल ५०० वटवाघुळांचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उष्माघातामुळेच या वटवाघुळांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. (Vidarbha Heat Wave)
https://prahaar.in/2026/05/26/there-is-sufficient-fuel-stock-in-the-state-citizens-should-not-believe-in-rumors-minister-chhagan-bhujbal-appeals/
विदर्भात रेड अलर्ट, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा :
हवामान खात्याने मंगळवारी Amravati, Wardha, चंद्रपूर (Chandrapur) आणि गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर नागपूर (Nagpur) आणि अकोला (Akola) जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Vidarbha Heat Wave)
https://prahaar.in/2026/05/26/maharashtra-vidhan-parishad-elections-2026-excitement-over-seat-sharing-in-mahayuti-bjps-moves-accelerate-to-address-shindes-displeasure/
वाढत्या तापमानामुळे वाघ झाला हिंसक?
काही दिवसांपूर्वी Chandrapur जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभागाने तपास सुरू केला असून वाढत्या तापमानामुळे वाघ हिंसक झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
https://prahaar.in/2026/05/25/padma-awards-presented-by-the-president-late-actor-dharmendra-and-tamasha-artist-raghuveer-khedkar-honored/
विशेष म्हणजे या वाघाने एकाचवेळी तब्बल १३ महिलांवर हल्ला केला होता. वनविभागाने या वाघाला जेरबंद केले असून त्याच्या हिंसक वर्तनामागील कारणांचा सखोल अभ्यास सुरू आहे.