चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात चार महिलांचा बळी घेणाऱ्या टी-2 वाघिणीला अखेर वनविभागाने शनिवारी रात्री जेरबंद करण्यात यश मिळवले. गुंजेवाही जंगल परिसरात पार पडलेल्या या थरारक कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक वाघिणीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (Chandrapur Tiger Attack)
https://prahaar.in/2026/05/22/tiger-attack-in-chandrapur-four-women-collecting-tendu-leaves-killed/
या हल्ल्यानंतर वनविभागाने विशेष पथक तयार करून गुंजेवाही-पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात मोठी शोधमोहीम सुरू केली. संबंधित वाघिणीला पकडण्यासाठी आवश्यक परवानग्या घेत ट्रॅप आणि ट्रॅन्क्युलायझरची व्यवस्था करण्यात आली होती. वनअधिकाऱ्यांनी जंगलातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत ऑपरेशन युद्धपातळीवर राबवले. (Chandrapur Tiger Attack)
https://prahaar.in/2026/05/24/rcc-classes-shivraj-motegaonkar-neet-controversy-now-a-flood-of-memes-motegaonkars-water-therapy-is-being-discussed-heavily-on-social-media/
दरम्यान, टी-2 वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
कविता दादाजी मोहुर्ले (४५)
अनिता दादाजी मोहुर्ले (४६)
संगीता संतोष चौधरी (४०)
सुनीता कौशिक मोहुर्ले (३५)
गावकऱ्यांनी वनविभागाच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले असले तरी परिसरात अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे. वनविभागाने नागरिकांना जंगल परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. (Chandrapur Tiger Attack)