मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मागील पावणे चार वर्षे नगरसेवक नव्हते म्हणून महापालिका प्रशासनातील अधिकारी जर आता नगरसेवकांना गिनतीत धरत नसतील तर हे चालणार नाही. आणि नगरसेवकांना गृहीत धरून जर ते काम करत असतील ते तर मुळीच चालणार नाही. नवनिर्वाचित नवीन नगरसेवकांना तर अधिकाऱ्यांनी गृहीत धरून काम करूच नये. शेवटी प्रत्येक नगरसेवकाला ४० ते ५० हजार लोकांनी निवडून दिलेले आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकांचा सन्मान हा अधिकाऱ्यांनी राखलाच पाहिजे असे महापालिका सभागृहात सांगत महापौरांनी प्रशासनाचे कान टोचले.
https://prahaar.in/2026/05/10/municipal-corporation-budget-approved-now-corporators-have-an-account-open-to-use-development-funds/
याला शिवसेनेच्या नगरसेविका निर्मिती कानडे यांनी पाठिंबा देताना आपल्या प्रभागात नाल्यातील गााळ काढून ठेवला आहे पण तो ६ ते ७ दिवस झाले तरी उचलत नाही. तसेच यापूर्वी काढलेला गाळ तिथेच असून त्यावर आता आणखी नवीन गाळ जमा केला आहे. पण जुना गाळ आपण नेणार नाही असेही सांगत आहेत. आम्ही नविन नगरसेवक असल्यामुळे अधिकारी ही उडवाउडवीची उत्तरे देत असून आमदार पराग शाह यांनी घेतलेल्या बैठकीत मी हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला तो उपायुक्तांनी हात दाखवून तुम्ही थांबा असे निर्देश करत मला बोलू दिले नाही असे सांगितले. त्यामुळे आम्ही कामे करायची नाही का असा सवाल केला.
https://prahaar.in/2026/05/10/the-municipal-corporations-vision-of-events-in-mumbai-has-become-dim-the-quality-of-the-video-wall-in-the-emergency-control-room-has-deteriorated/