मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे आणि स्पष्ट वक्तव्य केले आहे. “महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे, पण भाषेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची हिंसा आम्ही स्वीकारणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. अलीकडेच ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
https://prahaar.in/2026/05/01/lpg-gas-price-hike-inflation-flare-up-gas-cylinder-becomes-expensive-by-rs-993-know-how-much-will-you-have-to-pay-for-one-cylinder/
दरम्यान, सार्वजनिक वाहतूक चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयामुळे राज्यात विविध मतप्रवाह निर्माण झाले होते. त्यानंतर सरकारने चालकांसाठी मराठी शिकण्याची मुदत १ मे ऐवजी १५ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. (Devendra Fadnavis)
https://prahaar.in/2026/05/01/maharashtra-din-2026-maharashtra-day-celebrated-with-enthusiasm-in-thane-flag-hoisted-by-deputy-chief-minister-eknath-shinde/
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत त्यांनी ‘महाराष्ट्र धर्म’ आजही राज्यातील जनतेला एकता आणि अभिमानाची प्रेरणा देत असल्याचे सांगितले.
View this post on Instagram