ठाणे : डोंबिवली स्थानकावर रिकाम्या रेल्वेचा डब्बा घसरला आणि संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, त्या दिवसापासून लोकल या उशिराने धावत आहेत, आज तिसरा दिवस उजाडला तरी लोकल चे वेळापत्रक सुधारलेले दिसत नाही आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणताही अधिकृत मेगाब्लॉक जाहीर केलेला नसताना लोकलची वेळ बिघडल्यामुळे लोकलचा पुरता बोजवारा उडाला आहे.
https://prahaar.in/2026/04/20/mumbai-local-empty-local-coach-derails-in-dombivli-train-schedule-disrupted/
सोमवारची ती दुर्घटना आणि तीन दिवस मनस्ताप
मेगाब्लॉकच्या वावड्या उठल्या
सकाळची पहिलीच लोकल कासाराहून पाऊण तास उशिराने धावली. मिळालेल्या माहितीनुसार आसनगाव दरम्यान लोकल फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली होती. मात्र ठाण्यापासून पुन्हा ती स्लो ट्रॅकवर चालवण्यात आली. जेव्हा प्रवाशांनी याबाबत विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉकचे कारण पुढे करण्यात आले.
https://prahaar.in/2026/04/21/diagnostic-center-in-borivalis-punjabi-galli-handed-over-to-a-private-entity/
प्रवाशांचा तीव्र संताप
सलग तीन दिवस मध्य रेल्वेची वाहतूक गर्दीच्या वेळेला विस्कळीत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या त्रासामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे. आमच्या वेळेला किंमत नाही का ? असा सवाल प्रवासी विचारू लागले आहेत.