Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या भरावाचा काही भाग खचल्याच्या गंभीर घटनेची दखल अखेर केंद्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, दोषी आढळणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आणि संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
https://prahaar.in/2026/08/06/ashok-kharat-case-two-thousand-fake-signatures-though-paralysis-in-hand/
दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट
सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या भरावाचा काही भाग अचानक खचल्याने या प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेनंतर खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली होती. यानंतर खासदार स्मिता वाघ यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
त्यांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. चौकशीत संबंधित कंत्राटदार दोषी आढळल्यास त्याला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्यात येणार असून, या कामासाठी जबाबदार अधिकारी आणि संबंधित व्यक्तींवरही कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहेत. निकृष्ट दर्जाची कामे कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/08/06/jalgaontwo-died-in-an-accident-while-one-drowned-in-a-lake/
दोषींवर कोणती कारवाई होणार ?
दरम्यान, बायपासवरील भराव खचल्याच्या घटनेनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) , जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil), आमदार सुरेश भोळे (MLA Suresh Bhole) , महापौर दीपमाला काळे (Mayor Deepmala Kale), जिल्हाधिकारी रोहन घुगे (District Collector Rohan Ghuge) आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (Superintendent of Police Shrikant Dhivare) यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर राष्ट्रीय महामार्गावरील कामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशी अहवालात नेमके कोण जबाबदार ठरतात आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे आता जळगावसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.