Nashik : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीत येणाऱ्या लाखो भाविकांसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त नियोजन सुरू केले आहे. नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार आणि उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
https://prahaar.in/2026/08/06/ashok-kharat-case-two-thousand-fake-signatures-though-paralysis-in-hand/
भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासन सज्ज
श्रावण महिन्यात विशेषतः तिसऱ्या सोमवारी होणाऱ्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. मात्र, संपूर्ण महिनाभर शहरात भाविकांची वर्दळ कायम असल्याने सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, पथदिवे दुरुस्त करणे, धोकादायक विजेच्या तारा हटवणे, जुन्या इमारती आणि धोकादायक झाडांवर उपाययोजना करणे, तसेच शुद्ध पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
https://prahaar.in/2026/08/06/avoid-misusing-the-alarm-chain-on-trains/
त्र्यंबकला वाहतूक नियोजनावर भर
दरम्यान, पोलिस प्रशासन, रिक्षा युनियन आणि स्थानिक गाइड यांच्यासोबतही स्वतंत्र बैठक घेण्यात आली. श्रावण काळात वाहतूक कोंडी टाळणे, रिक्षा अधिकृत ठिकाणीच उभ्या करणे, तसेच भाविकांची फसवणूक किंवा गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज असून, सुरक्षित आणि सुकर दर्शनासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.