नवी दिल्ली : कर्मचारी भरपाई कायद्याची व्याख्या करताना उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, जर एखादा कर्मचारी कार्यस्थळावर ‘लंच ब्रेक’ (जेवणाच्या सुट्टी) दरम्यान अपघाताचा बळी ठरला, तर तो अपघातही ‘कामावर असतानाच झालेला अपघात’ मानला जाईल आणि तो कर्मचारी भरपाई मिळण्यास पात्र असेल. जेवणासाठी घेतलेली तात्पुरती विश्रांती ही कर्मचारी आणि त्याचे काम यामधील संबंध संपुष्टात आणत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
https://prahaar.in/2026/08/02/actor-hrithik-roshan-earns-a-huge-amount-of-money-by-renting-out-office-space/
न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांनी ‘नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ची याचिका फेटाळताना ही टिप्पणी केली. विमा कंपनीने कर्मचाऱ्याला दिलेल्या ७.८६ लाख रुपयांच्या भरपाईला न्यायालयात आव्हान दिले होते. अपघात लंच ब्रेकदरम्यान झाला असल्याने तो कामाच्या वेळेत झालेला अपघात मानला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद विमा कंपनीने केला होता. तसेच, पीडित व्यक्ती ‘सुपरवायझर’ असल्याने ती कर्मचारी भरपाई कायद्यांतर्गत ‘कर्मचारी’ या श्रेणीत येत नाही, असा दावाही कंपनीने केला होता. न्यायालयाने हे दोन्ही युक्तिवाद फेटाळून लावत कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल दिला.
https://prahaar.in/2026/08/02/justice-anu-grover-baliga-transferred-hearing-on-neet-paper-leak-set-for-monday-august-3/
काय आहे प्रकरण ?
हे प्रकरण २०१० मधील आहे. दिल्लीतील एका बांधकाम प्रकल्पावर ‘सुपरवायझर’ म्हणून कार्यरत असलेला कर्मचारी लंच ब्रेकदरम्यान तिथेच उपस्थित होता. त्याच वेळी मोबाईल क्रेनवरून नेली जाणारी लोखंडी सळई त्याच्यावर पडली, ज्यामुळे त्याचा डावा पाय कापावा लागला. कर्मचारी भरपाई आयुक्तांनी त्याला ७.८६ लाख रुपये आणि त्यावर व्याज देण्याचे आदेश दिले होते.