पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला (TMC) पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री कोयल मल्लिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केवळ चार महिन्यांपूर्वीच, ६ एप्रिल रोजी राज्यसभेत प्रवेश करणाऱ्या कोयल मल्लिक यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
https://prahaar.in/2026/07/16/the-baby-whom-messi-bathed-19-years-ago-is-now-his-opponent-in-the-world-cup-final/
पक्षांतर्गत मोठी गळती
कोयल मल्लिक यांच्या राजीनाम्यामुळे तृणमूल काँग्रेसला बसलेल्या धक्क्यांची मालिका अधिक गडद झाली आहे. याआधी सुखेंदू शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बारिक यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. विशेष म्हणजे, याआधी पक्ष सोडलेल्या अनेक खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून ते आता राज्यसभेची पोटनिवडणूक लढवत आहेत.
https://prahaar.in/2026/07/16/nashik-crime-news-the-inside-story-of-the-gang-that-robbed-%e2%82%b970-lakhs/
ममता बॅनर्जींसमोर पेच
कोयल मल्लिक यांनी गुरुवारी राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन अधिकृतपणे आपला राजीनामा सोपवला. राजकीय विश्लेषकांच्या मते, या निर्णयाचा संबंध पक्षाचे निष्ठावान नेते मदन मित्रा यांच्या राजीनाम्याशी असू शकतो, ज्यांनी कोयल मल्लिक यांच्या राजीनाम्याच्या अवघ्या एक दिवस आधीच पक्षाचा त्याग केला होता.
पश्चिम बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. खासदार, आमदार, नगरसेवक आणि तळागाळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्ष सोडून जात असल्याने ममता बॅनर्जींसमोर आपल्या संघटनेला वाचवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकेकाळी ममता बॅनर्जींनी ज्या नेत्यांना घडवले, आता तेच नेते साथ सोडून जात असल्याने पक्षात नेतृत्वाबाबत मोठी नाराजी दिसून येत आहे.